HW News Marathi
राजकारण

‘२०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार’

कल्याण | येत्या दहा वर्षात राज्यभरातील सर्व रस्त्याला एकही खड्डे नसणार, असे वक्तव्य सार्वजनिक कामगार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच २०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल, असा दावा पाटील यांनी व्यक्त केला आहे. गावात मंत्री येणार ही माहिती मिळताच सर्व सरकारी कर्मचारी कामाला लागतात. रस्ते सुधारण्याची किंवा रस्ते बनवण्याची सूचना नसेल तरी रस्ते बनविले जातात असे धक्कादायक वक्तव्य सार्वजनिक कामगार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

तसेच कल्याण-पडघा रोडवरील बापसाई गावात सुरेश हावरे यांनी उभारलेल्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांना पाटील यांच्या हस्ते चाव्या वाटप करण्यात आले. रस्ते विकसित केल्यावर तीन ते पाच वर्षात रस्ता खराब झाला अथवा रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधीत कंपयांकडून रस्ता दुरुस्ती देखभालीचे दायित्व दिले जाणार आहे व खड्डे बुजविण्याची जबाबदारी निश्चित केले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मान्सूनची लहर आणि हवामान खात्याचा कहर

News Desk

पंतप्रधानांकडे आता प्रचारासाठी कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत !

News Desk

“कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे”, छगन भुजबळांचा टोला

Aprna
मनोरंजन

तनुश्री दत्ताने राखी सावंतवर ठोकला मानहानीचा दावा

Gauri Tilekar

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने #metoo अंतर्गत अभिनेते नाना पटेकरांवर काहीच दिवसांपूर्वी गैरवर्तनाचा आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र #metoo ची चर्चा सुरू आहे. नाना पाटेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. राखी सावंत हिने नाना पाटेकरांची बाजू घेत प्रसारमाध्यमांसमोर तनुश्रीला ड्रग ऍडिक्ट असल्याचा खालच्या पातळीचा आरोप केला होता. यामुळेच तनुश्रीने राखी सावंतवर १० लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. ट्विंकल खन्ना, ऋचा चड्डा, स्वरा भास्कर ,फरहान अख्तर अशा सेलिब्रिटी मंडळींनी तनुश्री दत्ताची बाजू घेतली आहे.

मुलाखतीच्या दरम्यान राखी म्हणाली, “हॉर्न ओके प्लिज या सिनेमाच्या शूट दरम्यान तनुश्रीने अर्ध गाणे चित्रित केले आणि मध्येच सोडले होते. तनुश्रीने ड्रग घेतल्याने ती ते गाणे पूर्ण करू शकली नाही आणि त्यामुळे गणेश आचार्यांनी मला फोन करून बोलावले,” असे राखी सावंत म्हणाली. यावेळी राखी सावंत हिने तनुश्रीसाठी अपशब्द देखील वापरले आहेत. यामुळेच तनुश्रीने राखीवर १० लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे.

Related posts

आगमन बाप्पाचे | ‘श्री’रंगी रंगल्या बाजारपेठा

swarit

राजाच्या दरबारी पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की

News Desk

बिग बींना ७६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा….

Gauri Tilekar