HW News Marathi
राजकारण

आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये !

नवी दिल्ली | “आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये. केंद्राकडून पुरविण्यात आलेल्या निधीचा वापर जनतेच्या भल्यासाठी करावा. निवडणुका येतील आणि जातील”, असे म्हणत पंतप्रधान मोदी ओडिसा सरकारला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आज ओडिसा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विकास योजनांचे उदघाटन आणि लोकार्पण केले. या कार्यक्रमामध्ये संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मात देण्यासाठी विरोधकांची महाआघाडी आणि सप-बसपच्या आघाडीवर मोदींनी निशाणा साधला आहे. “सध्या देशात माझ्याविरोधात कारस्थान रचले जात आहे. खोटे आरोप केले जात आहेत. मला त्यांच्या मार्गातून हटविण्यासाठी ते एकत्र येत आहेत. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो कि हा चौकीदार गरिबांना लुटणाऱ्या प्रत्येकाला हा चौकीदार शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असा इशारा मोदींनी दिला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी दर दोन-तीन दिवसांआड महाराष्ट्रात येत आहेत, राजकीय हवा बदलत आहे !

News Desk

शरद पवारांनी घेतली राणेंची भेट, राजकीय चर्चेला उधाण

News Desk

मोदींच्या समस्या वाढविण्यासाठी निवडणूक लढवणारे प्रवीण तोगडीया

News Desk