HW News Marathi
राजकारण

आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये !

नवी दिल्ली | “आदिवासींच्या हितासाठी ओडिसा सरकारने निवडणुकांची वाट पाहू नये. केंद्राकडून पुरविण्यात आलेल्या निधीचा वापर जनतेच्या भल्यासाठी करावा. निवडणुका येतील आणि जातील”, असे म्हणत पंतप्रधान मोदी ओडिसा सरकारला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आज ओडिसा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विकास योजनांचे उदघाटन आणि लोकार्पण केले. या कार्यक्रमामध्ये संबोधित करत असताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मात देण्यासाठी विरोधकांची महाआघाडी आणि सप-बसपच्या आघाडीवर मोदींनी निशाणा साधला आहे. “सध्या देशात माझ्याविरोधात कारस्थान रचले जात आहे. खोटे आरोप केले जात आहेत. मला त्यांच्या मार्गातून हटविण्यासाठी ते एकत्र येत आहेत. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो कि हा चौकीदार गरिबांना लुटणाऱ्या प्रत्येकाला हा चौकीदार शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असा इशारा मोदींनी दिला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधान परिषदेच्या मतमोजणीत 2 आमदारांचे मते बाद

Aprna

फडणवीसांची तुलना थेट श्री रामाशी करून दिल्या भाजपच्या ‘या’ आमदाराने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Aprna

“… माझ्यावर हल्ला करण्याचा कट”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Aprna
राजकारण

सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारचा समाचार

News Desk

मुंबई | आज (मंगळवारी) शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असून १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती .आज शिवसेनेला ५२ वर्ष पुर्ण झाली आहेत त्यानिमित्त ‘सामना’च्या अग्रलेखातून 2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होणार नाही असे म्हणत शिवसेनेने भाजपा वर निशाना साधला आहे. तर 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचीच सत्ता येईल असे म्हणत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

केंद्रात सत्तेवर कोण येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद शिवसेना राष्ट्रीय पातळीवर निर्माण करेल असा विश्वासही अग्रलेखातून व्यक्त केला आहे. दिल्लीतील आपचे आंदोलन, जवानांची हत्या, लोकशाहीच्या मुद्द्यावरून भाजपा व पंतप्रधान मोदींवर सामनाच्या अग्रलेखातून तोफ डागण्यात आली आहे. देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर सत्तेचा माज आम्हाला कधी चढला नाही आणि पुढेही आम्ही तो चढू देणार नाही.काश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे.

नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणे व राज्य चालविणे मुश्कील होईल’, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे . उत्तर भारतात ऊठलेल्या धुळीचा काणोसा घेत ‘धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत . मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळ्य़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. असा टोमना वजा सूचक इशारा भाजपला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Related posts

“…तर राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली”, अजित पवारांची टीका

Aprna

भाजप सरकारच्या काळात महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले ! 

News Desk

चिमुरडीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला

News Desk