HW News Marathi
राजकारण

राम मंदिराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींची शिवसेनेवर टीका

नाशिक | “राम मंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, काही लोक चुकीचे वक्तव्य करत आहेत,” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शिवसेनेवर टीका केली आहे. मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या जाहीर सभेत पहिल्यांदा राम मंदिराच्या मुद्यावर जाहीर सभेत भाष्य केले.

मोदी पुढे म्हणाले की, “गेल्या दोन तीन आठवड्यांपासून काही बडबड करणारे लोक राममंदिराविषयी काहीही बरळत आहेत, मी या बोलघेवड्या लोकांना हात जोडून विनंती करतो, की देवासाठी, प्रभू श्रीरामासाठी तरी डोळे बंद करून भारताच्या न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेवा,” असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला.

जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० कलम रद्द करताना केंद्र सरकारने जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच पाऊल अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी उचलत त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मोदींचा हा अप्रत्यक्ष टोला लगवल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी !

News Desk

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; विरोधकांची घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणला

Aprna

काश्मीर विधानसभा बरखास्त, मुफ्तींचे राज्यपालांना पत्र

News Desk