HW News Marathi
राजकारण

राजकीय नेत्यांनी इतर क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये !

यवतमाळ | राजकीय नेत्यांनी इतर क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ते यवतमाळ येथील ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याच्या वेळी बोलत होते. गडकरी यांनी पुढे असे देखील म्हणाले की, राजकारणाचा अर्थ समाजकारण आहे. परंतु, सध्या सत्ताकारणाचा अर्थ राजकारण होत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिले होते. परंतु काही कारणास्तव सहगल यांना संमेलनाला येऊ नये, असे सांगण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारवर टीका झाली होती. त्यामध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भर पडली आहे. राजकीय नेते मंडळींनी कोणत्याही क्षेत्रात हस्तक्षेप करू नये. मतभिन्नता असावी पण मनभिन्नता असू नये. भारतीय संस्कृती मुल्याधिष्ठीत आहे. राजकारणावर सामाजिक दंडशक्ती असावी. साहित्यिकांनी अशी दंडशक्ती निर्माण करावी, असे गडकरी यावेळी म्हणाले. साहित्यिक आणि राजकारण्यांमध्ये संवाद असावा. वैशाली येडे यांना उद्घाटनास बोलावणे ही कौतुकास्पद बाब आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगालमधील आताची सरकारही एका व्यक्तीसाठी चालवली जाते !

News Desk

जाणून घ्या…’भारत जोडो यात्रे’ने महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ?

Aprna

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

Chetan Kirdat