HW News Marathi
राजकारण

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा स्वबळाचा नारा

लखनौ | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात शनिवारी (१२ जानेवारी) युतीची घोषणा केली. यानंतर अवघ्या २४ तासात रविवारी (१३ जानेवारी) काँग्रेसनेही उत्तर प्रदेशमध्ये स्वबळावर सर्व ८० जागा लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसचे सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.

तसेच भाजप विरोधातील जर कोणताही धर्मनिरपेक्ष पक्षाने युतीसाठी हात पुढे केला तर, त्या पक्षासाठी काँग्रेसचा दरवाजा खुला आहेत, असे काँग्रेसचे सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात सपा, बसपा आणि काँग्रेस महाआघाडी करणार होते. परंतु, सपा- बसपाने आघाडी करत काँग्रेसला या दोघांनी बाजूला केले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसने २००९ मधील लोकसभा निवडणुकीत २१ जागा जिंकल्या होत्या. आता आगामी निवडणुकीत या तुलेनत दुप्पटीने जागा जिंकू, अशी आशा देखील आझाद यांनी व्यक्त केली आहे.

आम्हाला उत्तर प्रदेशात भाजप विरोधात महाआघाडी निर्माण करायीच होती. परंतु कोणाला ही महाआघाडी नको असेल, तर काही होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सपा- बसपाच्या आघाडीवर बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर सर्व धर्मनिरपेक्ष पक्षाचे काँग्रेस स्वागत करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीआय हे जणू भाजप सरकारचे कुत्रे !

News Desk

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणत्याही अधिकृत घोषणेआधीच कमलनाथ यांचे अभिनंदन

News Desk

राष्ट्रपतींनी स्वीकारला एम.जे.अकबरांचा राजीनामा

News Desk