HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्यासह शिष्टमंडळ रवाना

मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सहाजनांचे शिष्ट मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहे. मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर यांच्या चर्चेतून काय निर्णय घेण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. भिमा-कोरेगाव दंगली प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘एल्गार मोर्चा’ काढला आहे.

तसेच एल्गार मोर्चात सहभागी झालेले श्रीमंत कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहे. ‘संभाजी भिडे यांना अटक होत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करा,’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.

या मोर्चाला सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सीएसटी येथून सुरुवात होईल. सर्व मोर्चेकरी आझाद मैदानात दाखल झाले. हा मोर्चा जिजामाता उद्यान येथून आझाद मैदानपर्यंत रॅली काढण्यात येणार होती. पण, पोलिसांनी रॅलीसाठी परवानगी नाकारल्यामुळे सर्व मोर्चेकरी सीएसटी स्टेशन येथून सरळ आझाद मैदानात मोर्चेसाठी दाखल झाले. त्यानंतर सर्व मोर्चा आझाद मैदानात जमून सरकार विरोधात घोषणा देत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मंत्रालयात पुन्हा एकदा महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होणार

News Desk

उंदरासाठी १३० कोटीचं घर 

News Desk
महाराष्ट्र

शहीद मेजर कौस्तुभ राणे पंचतत्वात विलीन

swarit

मुंबई | काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना भारतीय लष्करातील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे हे शहीद झाले. शहीद मेजर कौस्तुभ यांच्यावर आज लष्करी इतमामात आज दुपारी बाराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाणेच्या मिरारोड येथील नागरिकांनी कौस्तुभ यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे कौस्तुभ यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन राणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सोमवारी रात्री काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना चार जवानांना वीरमरण आले होते. यात मीरा रोडच्या शीतल नगर भागात राहणाऱ्या २९ वर्षांच्या मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचाही समावेश आहे.

मेजर राणे यांच्या मातोश्री ज्योती, पत्नी कनिका, मुलगा अगस्त्य, बहिण कश्यपी यांनी स्मशानभूमीत अखेरची श्रध्दांजली वाहिली त्यावेळी भावनाविवश नागरिकांनी “भारतमाता की जय, माँ तुझे सलाम अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी लष्कराच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

Related posts

अखेर प्रीतम मुंडे नाराज समर्थकांच्या भेटीला

News Desk

मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला हे नाव घेऊन सांगतो – एकनाथ खडसे

News Desk

मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी वाहिली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईच्या स्मृतीस श्रद्धांजली

News Desk