HW News Marathi
राजकारण

उमेदवार यादीत समाजाचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने देखील नुकतीच आपल्या ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, वंचित बहुजन समाजाची ही यादी वादाच्या भोवऱ्यात अडकली. त्याचे कारण म्हणजे या यादीतील सर्व उमेदवारांच्या नावांपुढे कंसात त्यांच्या समाजाचा उल्लेख करण्यात आला आहे.दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, “आम्ही आज जात जाहीर केली. कारण ही पद्धत कोणताही पक्ष स्वीकारत नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मराठा समाज सोडून इतर समाजातील उमेदवारांना उमेदवारी दिली गेलेली नाही”

“आम्ही आज जात जाहीर केली. आम्ही निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी दिली आहे. ही पद्धत कोणताही राजकीय पक्ष स्वीकारत नाही. या नव्या पद्धतीने राजकारणाची दिशा बदलेल”, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे “मारवाडी आणि जैन समाज हा भाजपसोबत असल्याने आम्ही त्यांना गृहीत धरलेले नसले तरीही त्यांची इच्छा असेल तर ते आमच्याकडे खुल्या मनाने येऊ शकतात. ब्राह्मण आणि कोमटी समाजातील कुणीही आमच्याकडे उमेदवारी मागितली नाही”, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 73 वा वर्धापन दिन साजरा

News Desk

सत्ता नको, मला विरोधी पक्ष व्हायचंय !

Gauri Tilekar