HW News Marathi
राजकारण

उमेदवार यादीत समाजाचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने देखील नुकतीच आपल्या ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, वंचित बहुजन समाजाची ही यादी वादाच्या भोवऱ्यात अडकली. त्याचे कारण म्हणजे या यादीतील सर्व उमेदवारांच्या नावांपुढे कंसात त्यांच्या समाजाचा उल्लेख करण्यात आला आहे.दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, “आम्ही आज जात जाहीर केली. कारण ही पद्धत कोणताही पक्ष स्वीकारत नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मराठा समाज सोडून इतर समाजातील उमेदवारांना उमेदवारी दिली गेलेली नाही”

“आम्ही आज जात जाहीर केली. आम्ही निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी दिली आहे. ही पद्धत कोणताही राजकीय पक्ष स्वीकारत नाही. या नव्या पद्धतीने राजकारणाची दिशा बदलेल”, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे “मारवाडी आणि जैन समाज हा भाजपसोबत असल्याने आम्ही त्यांना गृहीत धरलेले नसले तरीही त्यांची इच्छा असेल तर ते आमच्याकडे खुल्या मनाने येऊ शकतात. ब्राह्मण आणि कोमटी समाजातील कुणीही आमच्याकडे उमेदवारी मागितली नाही”, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महिलांनी एकीचा इतिहास घडवावा, राम कदमांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे कडाडले

News Desk

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा – तसा वाटला का?”, अजित पवारांचा संतप्त सवाल

Aprna

आताचे अन् विधानसभेनंतरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

News Desk
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या प्रचाराला सुरुवात, #MainBhiChowkidar सोशल मीडियावर ट्रेंड

News Desk

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक गुजरातच्या विकास मॉडेलने जिंकले होते. आता २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदींनी ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहिम राबविण्यास आज (१६ मार्च) पासून सुरुवात केली आहे. ही मोहिम सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा अनोख्या पद्धतीने प्रसार करण्यास सुरुवात केली आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत ‘मैं भी चौकीदार’ प्रचार मोहिमेचा श्रीगणेश केला आहे. या मोहिमेतर्गंत ते ३१ मार्च रोजी देशभरातील जनतेशी संवाद साधणार आहेत, असे आवाहन मोदींनी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आपला चौकीदार देशाच्या सेवेसाठी उभा आहे. परंतु, मी एकटा नाही. प्रत्येकजण जो भ्रष्टाचार, घाण आणि समाजातील वाईट गोष्टींविरोधात लढा देत आहे. तो चौकीदार आहे. जो प्रत्येकजण देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहे. तो चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणत आहे

Related posts

माझे नरेंद्र मोदींवर प्रेम मात्र त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार !

News Desk

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधींचे मराठीतून ट्विट

News Desk

राहुल गांधींनी देशाची माफी मागावी | दाणवे

News Desk