HW News Marathi
राजकारण

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा काॅंग्रेसला पाठिंबा

जालना | काँग्रेसचे जालनातील विलास औताडेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे. केवळ भाजपचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी काँग्रेसला याठिकाणी पाठिंबा दिल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मी काँग्रेसच्या बाजूने कधीच नव्हतो आणि नसणार आहे. परंतु रावसाहेब दानवेंना पाडण्यासाठी काँग्रेसला मतदान करणार आहे. तसेच काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे.

आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलतांनी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे. रावसाहेब दानवेंना जालन्यातून जिंकू देणार नाही. जर शेतकऱ्यांना शिव्या देणारे दानवे येथे निवडून आले, तर आमची इज्जत पुन्हा खाली गेल्या शिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. परंतु त्यानंतर आपण दानवे यांच्या विरोधात प्रचार करून त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ असे जाहीरपणे म्हटले आहे. आज बच्चू कडू यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत भाजप रावसाहेब दानवे यांच्या समोर आव्हान उभे केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधींचे मराठीतून ट्विट

News Desk

शिवसेना आजही आपल्या भूमिकेवर ठाम

News Desk

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk