HW News Marathi
राजकारण

प्रियांका गांधी गंगेचे पाणी पिऊ शकल्या इतकी गंगा स्वच्छ आहे !

नवी दिल्ली | “प्रियांका गांधी गंगेचे पाणी पिऊ शकल्या इतकी गंगा स्वच्छ झाली आहे”, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. “आतापर्यंत गंगा ३०% शुद्ध झाली आहे. प्रियांका गांधी याच गंगेचे पाणी प्यायल्या आहेत. जर गंगा शुद्ध झाली नसती तर त्या गंगेचे पिऊ शकल्या असत्या का ?”, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले आहेत. ते मध्य प्रदेशमध्ये एका सभेत बोलत होते.

“आमच्या सरकारने इतक्या सोयीसुविधा केल्या आहेत की आता त्या जलमार्गाने प्रयागराजहून वाराणसीला जाऊ शकतात”, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. “तब्बल १२ हजार कोटी रुपये खर्च करून गंगोत्री, यमुनोत्री, बद्रिनाथ आणि केदारनाथकडे जाणारे रस्ते बांधले आहेत. कोणत्याही ऋतूत हे रस्ते चांगलेच राहतील”, असा दावा देखील नितीन गडकरी यांनी यावेळी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk

“बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय…,” ED च्या कारवाईवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Aprna

मुंबईतील रस्त्याची परिस्थिती पाहून नितेश राणेंची शिवसेनेवर टीका

News Desk