HW News Marathi
राजकारण

राहुल गांधींनी देशाची माफी मागावी | दाणवे

मुंबई | न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा काँग्रेस पक्षाला रोखता येत नसल्यामुळे राहुल गांधीसह त्यांचे सहकारी विकासाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष हटवत असल्याचा आरोप दाणवे यांनी केला. जनता अशा आरोपांना बळी पडणार नाही आणि भाजपही विकासाच्या मुद्द्यावरून दूर जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांनी लोया यांच्या मृत्यू प्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती . तसेच राहुल गांधी यांनी दीडशे खासदारांसोबत राष्ट्रपतींकडे जाऊन संशयाचे वातावरण निर्माण केले होते. राहुल गांधींनी या विषयात घाणेरडे राजकारण केल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झाले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या बदनामीचे कारस्थान केल्याबद्दल आणि न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल राहुल यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असे दानवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री अमित शहा आज मुंबईत दाखल होणार; उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार

Aprna

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल ही कोणा एकाची वैयक्तिक नाही !

News Desk

चंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर

Gauri Tilekar