HW News Marathi
राजकारण

मराठी वाचवण्यासाठी साहित्यिक काय करतात: राज ठाकरे

सांगली : महाराष्ट्राची स्थिती बिघडली असताना कुठे गेले साहित्यिक? ते भूमिका का घेत नाहीत? का बोलत नाहीत? का लिहीत नाहीत?

जर आजची वेळ निघून गेली की पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. राजकीय भिंतींसह सगळ्या जातीच्या भिंती पाडायला हव्यात. गायकांचे राग वेगळे आणि आमचे राग वेगळे, त्यांचे राग ऐकू वाटतात, पण आमचे राग परवडत नाहीत, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. सांगलीत औदुंबर साहित्य संमेलनात राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात दर्जा मिळाला, पण मराठीला अजून भाषेचा अभिजात दर्जा मिळाला नाही.

कदाचित गुजराती भाषेला हा दर्जा मिळू शकतो, ते पण अर्ज न करता. राज ठाकरे यांनी यावेळी मोदींवर निशाणा साधला आहे. शहरांची स्थिती काय आहे ? तुम्ही बेसावध आहात. मराठी भाषा टिकावी, पण त्या अगोदर, मराठी माणूस अगोदर टिकला पाहिजे. सांगलीत म्हणे सद्भावना रॅली काढली, पण अशा रॅली काढून सद्भावना येत नाही, तुमच्या मनातून सद्भावना यावी लागते. महाराष्ट्रात काय चाललंय हे कवी आणि साहित्य क्षेत्रातील लोकांनी बोलावं
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या… आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय

Aprna

“झुकेंगे नहीं लढेंगे…और जीतेंगे भी”; जयंत पाटलांचा इशारा

News Desk

नरेंद्र मोदी हे माझे कोणत्याही प्रकारे शिष्य नाहीत !

News Desk
राजकारण

ते राजा मी सरदार

swarit

मुंबई: प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते ह्यराजाह्ण असतील तर, मी ह्यसरदारह्ण तरी आहे. मला दलित चळवळीमध्ये डावलले जाऊ शकत नाही. रिपब्लिकन ऐक्य व्हायला हवं आणि ते फक्त प्रकाश आंबेडकरच करू शकतात. मात्र माझे मंत्रिपद घालवण्यासाठी हे ऐक्य होत असेल तर, मी शिवसेना-भाजपा सोबतच मी राहणार असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमासाठी औरंगाबादमध्ये आले असता त्यांनी सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला.

Related posts

युतीसाठी अमित शहांचे ‘मातोश्री’च्या दिशेने एक पाऊल पुढे

News Desk

सरकारने ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरुच ठेवावे, रोहित पवारांची मागणी

News Desk

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने भोसरी MIDC मधील धक्कादायक प्रकार आणला उघडकीस

News Desk