HW News Marathi
राजकारण

“झुकेंगे नहीं लढेंगे…और जीतेंगे भी”; जयंत पाटलांचा इशारा

मुंबई | महाविकासआघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर सुरु झालेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे राज्यात निर्माण झालेल्या सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला अर्थात केंद्र सरकारला एक इशारा दिला आहे. “झुकेंगे नहीं लढेंगे…और जीतेंगे भी”, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे. तळेगाव येथील जाहीर सभेत जयंत पाटील कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

जयंत पाटील म्हणाले कि, “आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘दिल्लीसमोर कधी झुकायचं नाही’ हीच शिकवण दिली आहे. झुकेंगे नहीं लढेंगे…और जीतेंगे भी. महाराष्ट्रात दिल्लीश्वराने नेहमीच कपट कारस्थानं केली. मात्र, दिल्लीचा हुकूमशाहा कितीही कावेबाज असला तरी महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही, झुकणारही नाही. ही परंपरा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली आहे.” सरकारमधील नेत्यांवर एका मागोमाग एक केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईवर जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलं.

…म्हणून त्यांनी मंत्र्यांवर धाडी घालण्याचं काम सुरू केलं!

जयंत पाटील पुढे म्हणाले कि, “भाजप महाराष्ट्र सरकारबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम करत आहे. राज्यातील सरकार त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. हे सरकार मोडून काढण्यासाठी कोणतेही मार्ग अवलंबण्याची त्यांची तयारी आहे. आमदारांना अमिष दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी यापूर्वीही असे प्रयत्न केलेत. पण त्याने काहीच साध्य होत नसल्याने त्यांनी मंत्र्यांवर धाडी घालण्याचं काम सुरू केलं आहे. हे सुडाचं राजकारण सुरू आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुसरीकडे जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, थोरातांचा विखे-पाटील यांना टोमणा

News Desk

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार ?

News Desk

प्लास्टिक बंदी होण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे !

News Desk