HW News Marathi
राजकारण

‘एमआयएम’च्या स्वबळाच्या निर्णयाचे आठवलेंकडून स्वागत

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (६ सप्टेंबर) औरंगाबादमध्ये केली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एमआयएमच्या या स्वबळाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. “गेल्या निवडणुकीत एमआयएमला ‘वंचित’मुळे कोणताही फायदा झालेला नाही. उलट एमआयएममुळेच ‘वंचित’ला फायदा झाला आहे”, असे म्हणत रामदास आठवले यांनी एमआयएमच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून ‘वंचित’मध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती.

“आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ज्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्याचप्रमाणे आता ‘वंचित’मधील देखील काही लोक आमच्या पक्षात येतील”, असा दावा देखील यावेळी रामदास आठवले यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला ८ हुन अधिक जागा देण्यास नकार दिल्याने अखेर एमआयएमने स्वबळाची घोषणा केल्याचे वृत्त आहे. त्यापूर्वी जागावाटपाकरिता प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात झालेल्या बैठकीला देखील अपयश आले होते.

इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आले. ‘वंचित’च्या या परिपत्रकानुसार एमआयएमसोबतची युती अद्याप कायम असल्याचे म्हणण्यात आले होते. जोपर्यंत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी स्वतः जाहीर करत नाहीत तोपर्यंत आघाडी कायम असल्याचे ‘वंचित’ने आपल्या परिपत्रकात स्पष्ट केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन बनवण्यासाठी प्रयत्नशील,” आदित्य ठाकरेंची माहिती

Aprna

शोपियान येथील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

इंदिरा गांधींसारखीच खाजगी सुरक्षा रक्षकाकडून माझीही हत्या होईल !

News Desk