HW News Marathi
राजकारण

औरंगाबादेत आठवलेंच्या भाषणाल विरोध

औरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे आठेवले यांना अवघ्या सात मिनिटांत आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. नामविस्तार दिनाच्या ‘एक विचार एक मंच’ला आठवले गटाने फारकत घेतली होती. त्यामुळे आठवलेंना कार्यकर्त्यांनी सभेला विरोध दर्शविला. कार्यकर्त्यांनी आठवले यांच्या भाषणालाच विरोध केला. कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी घोषणाबाजी करत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. पोलिस जमाव शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी पोलिस आयुक्त यशस्वी यादव उपस्थित आहे. भीमा कोरेगावच्या घटनेनंतर आठवले यांच्या भूमिकेमुळे एक गट नाराज असल्याने हे कृत्य झाल्याचे बोलले जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किती दलित, आदिवासी, मुस्लिमांना भारतरत्न मिळाले ?

News Desk

काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सूत्र हलवावीत हा त्यांचा डावपेच !

News Desk

“मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही”, महेश शिंदेंची धक्काबुक्कीनंतरची पहिली प्रतिक्रिया

Aprna