HW News Marathi
राजकारण

RamMandir : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेत कायदा करा, उद्धव ठाकरेंचे मोदींना अल्टीमेटम

अयोध्या | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आज अयोध्येत दाखल झाले आहेत. त्याठिकाणी त्यांनी संकल्प पूजा करुन राम मंदिर उभारणीसाठी चांदीची वीट अर्पण केली. आपल्या कुटुंबासह पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले. २४ आणि २५ नोव्हेंबर दोन दिवस हा दौरा असणार आहे. शिवनेरी गडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत पोहचले आहेत.

अयोध्येतून शिवसैनिकांना संबोधित करताना ते म्हणाले

– आता हिंदू वाट बघणार नाही, तो प्रश्न विचारणारच.

– संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठीशी राहिल. मात्र राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा

– अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही.

– आज पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, आता वारंवार येत राहणार.

– आजचा दिवस माझ्या आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा

– आता चला आपण सर्व मिळून मंदिर बनवू.

– अनेक महिने वर्षे झाली पण राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नाही.

– अध्यादेश आणायचा असेल तर सरकारने तो आणावा

– नोटांबदीचा निर्णय घेतला त्याप्रमाणे हा देखील निर्णय घ्यावा.

– तुम्ही विसरलेल्या वचनांची माहिती देण्यासाठी आज मी येथे आलोय.

– मंदिर बनविण्यासाठी हिंमत लागते. छाती कितीही मोठी असली तरी त्यामध्ये मर्दाचे हृदय असणे गरजेचे आहे.

– कायदा करून राम मंदिर उभारावे अशी मागणी त्यांनी केली आहे. मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी टीका करत दिलेला शब्द मोदी सरकारने पाळावा असेही त्यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटक सरकारमध्ये नवीन मंत्रिमंडळाची स्थापना ?

News Desk

भाजपचा मोठा विजय

News Desk

ईशान्य मुंबईचे दोन्ही उमेदवार कोटक, संजय दीना पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk