HW News Marathi
राजकारण

RamMandir : …म्हणून आज रात्रीच सर्व शिवसैनिक महाराष्ट्रात परतणार

अयोध्या | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात २५ डिसेंबरला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती . त्यांच्या या घोषणेनंतर सर्वच शिवसैनिक अत्यंत उत्साहाने या अयोध्या दौऱ्याच्या तयारीला लागले आणि अयोध्येत दाखल देखील झाले. मात्र, आता हे शिवसैनिक आज रात्री ११ वाजताच महाराष्ट्रात परतणार आहेत. दरम्यान, अद्याप या मागचे नेमके कारण समजलेले नसले तरीही सुरक्षेच्या कारणास्तव आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवसेनेकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे, उद्धव ठाकरे उद्या पत्रकारांशी आणि अयोध्येतील संवाद साधणार होते. परंतु, ते आता जनतेशी देखील संवाद साधणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

शिवसैनिक जरी आज (शनिवार) रात्रीच महाराष्ट्रात परतणार असले तरी उद्धव ठाकरे मात्र रविवारपर्यंत अयोध्येतच असणार आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदे पूर्वीच सर्व शिवसैनिक अयोध्येहून पुन्हा महाराष्ट्रात परतण्याची तयारी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून रेल्वे प्रशासनाला याबाबतचे पत्र लिहिण्यात आले आहे. खरंतरं शिवसैनिक हे रविवारपर्यंत अयोध्येत थांबणार होते. मात्र, ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे सर्व शिवसैनिक आज रात्रीच महाराष्ट्रात परतणार आहेत. त्याचप्रमाणे, उद्धव ठाकरे उद्या अयोध्येतील जनतेशी जो संवाद साधणार होते तो कार्यक्रम देखील रद्द झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे आज नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यावर

News Desk

ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध

News Desk

पहा… भाजप आमदार-खासदारांच्या गुणवत्ता चाचणीचा निकाल

News Desk