HW News Marathi
राजकारण

मनसेतून सेनेत आलेल्या सहा नगरसेवकांना तुर्तास दिलासा

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मनसेतून दिलीप लांडेंच्या नेतृत्वाखाली मनसेतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या संदर्भात मनसेने कोकण आयुक्तांकडे आव्हान दिले. याप्रकरणाचा निकाल तीन महिन्याच्या कालावधीत येणे अपेक्षित होते. परंतु, चार महिन्यानंतरही निकाल अद्याप आला नसून वारंवार आयुक्त गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणाची सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली होती परंतु कोकण आयुक्त जगदीश पाटील गैरहजर राहिल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली आहे. दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलल्यामुळे तुर्तास या नगरसेवकांना दिलासा मिळाला असला तरी मनसे मात्र आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

…जेव्हा तुम्हाला परदेशी माध्यमे खरेदी करता येत नाहीत !

News Desk

भाजपच्या मेळाव्यात मंत्री गिरिश महाजनांना धक्काबुक्की

News Desk

“आमच्यासोबत 12 नाही तर एकूण 18 खासदार,” एकनाथ शिंदेंचा दावा

Aprna
महाराष्ट्र

औरंगाबाद हिंसाचार प्रकरणी अडीच हजार लोकांवर गुन्हा दाखल

News Desk

औरंगाबाद | शहरात शुक्रवारी मध्य रात्री हिंसाचाराला दंगलीचे स्वरुप प्राप्त झाले. संपूर्ण औरंगाबादमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हिंसाचारा प्रकरणी पोलिसांनी २५००हून अधिक अज्ञात लोकांवर दंगल भडकवणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण व खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

औरंगाबाद शहरातील मोतीकारंजा परिसरात ११ मे रोजी रात्री दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद सुरु झाला आणि त्याचं पर्यावसन दगडफेक आणि जाळपोळीत झाले. घरे, दुकाने आणि रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेली वाहने यांच्या तोडफोड करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास २५ दुकाने जाळण्यात आली. या दगडफेक, जाळपोळीत ३० ते ४० जणे जखमी झाले, तर दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Related posts

प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी मंजूर

News Desk

मुंबई- अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात

News Desk

लोकायुक्तांकडून आज अनिल परब यांची सुनावणी!

News Desk