HW News Marathi
राजकारण

मनसेतून सेनेत आलेल्या सहा नगरसेवकांना तुर्तास दिलासा

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मनसेतून दिलीप लांडेंच्या नेतृत्वाखाली मनसेतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या संदर्भात मनसेने कोकण आयुक्तांकडे आव्हान दिले. याप्रकरणाचा निकाल तीन महिन्याच्या कालावधीत येणे अपेक्षित होते. परंतु, चार महिन्यानंतरही निकाल अद्याप आला नसून वारंवार आयुक्त गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणाची सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली होती परंतु कोकण आयुक्त जगदीश पाटील गैरहजर राहिल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली आहे. दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलल्यामुळे तुर्तास या नगरसेवकांना दिलासा मिळाला असला तरी मनसे मात्र आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चेंबूरमधील मैदानाला दिवंगत बाबुराव शेजवळ यांचे नाव देऊन स्मृती जोपासणार | आठवले

News Desk

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘हा’ निर्णय घेतल्यामुळे गोपीचंद पडळकरांनी मानले आभार

Aprna

पालघरमध्ये पैशांचा बाजार

News Desk