HW News Marathi
महाराष्ट्र

लोकायुक्तांकडून आज अनिल परब यांची सुनावणी!

मुंबई। राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष मिहीर कोटेचा यांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत राज्याच्या लोकायुक्तांकडून गुरुवारी सुनावणी होणार आहे. आमदार मिहीर कोटेचा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.कोटेचा यांनी पत्रकात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. राज्यपालांनी या तक्रारीची दखल घेऊन लोकायुक्तांना या प्रकरणी चौकशीचा आदेश दिला होता. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी 2 सप्टेंबर अर्थात आज होणार आहे.

मात्र परिवहन मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले….

आमदार कोटेचा यांनी सांगितले की, लॉकडाऊन काळात आयटी क्षेत्रातील कंपन्यांची वाईट अवस्था झाली असल्याने इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी निविदा प्रक्रियेतील अटींमध्ये तांत्रिक बदल करण्यात यावेत, असे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. त्यानुसार कंत्राटदाराच्या वार्षिक उलाढालीची अट 150 कोटींवरून 100 कोटींवर आणण्यात आली. याचबरोबर निविदेतील अटी आणि शर्तींमध्ये आणखी काही बदल करण्यात आले. निविदा शर्तीमधील बदल संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवावेत, अशी सूचना महामंडळाचे व्यवस्थापक पांडुरंग राऊत यांनी केली होती. मात्र, परिवहन मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आधी निविदा प्रसिध्द करावी व त्यानंतर संचालक मंडळाकडून त्यास मान्यता घ्यावी, असे आदेश काढले.

शिवसेनेभोवती ईडीचा पाश घट्ट होताना दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने छापा टाकले. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मविआतील ११ जण ईडीच्या रडारवर असल्याचं सांगत त्यांची नावं जाहीर केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामींसाठी आता देवेंद्र फडणवीसही मैदानात, कोर्टाने अर्णब यांना दिलेल्या वागणूकीची दखल घ्यावी

News Desk

महाविकास आघाडी सरकारच्या पूर्ण मंत्रिमंडळ मध्ये एकाही मंत्र्यंत ओबीसी च्या मुद्यावर राजीनामा देण्याची हिम्मत नाही…..प्रीतम मुंडे

Ruchita Chowdhary

राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आला, वाझेंच्या पत्रावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk