HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबाद हिंसाचार प्रकरणी अडीच हजार लोकांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद | शहरात शुक्रवारी मध्य रात्री हिंसाचाराला दंगलीचे स्वरुप प्राप्त झाले. संपूर्ण औरंगाबादमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हिंसाचारा प्रकरणी पोलिसांनी २५००हून अधिक अज्ञात लोकांवर दंगल भडकवणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण व खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ५० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

औरंगाबाद शहरातील मोतीकारंजा परिसरात ११ मे रोजी रात्री दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद सुरु झाला आणि त्याचं पर्यावसन दगडफेक आणि जाळपोळीत झाले. घरे, दुकाने आणि रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेली वाहने यांच्या तोडफोड करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास २५ दुकाने जाळण्यात आली. या दगडफेक, जाळपोळीत ३० ते ४० जणे जखमी झाले, तर दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नारायण राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं”, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

News Desk

मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला धक्कादायक वळण, बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीच्या घरावर NCB चा छापा

Ruchita Chowdhary

“आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, मात्र पवारांनी विश्वास ठेवला” – धनंजय मुंडे

News Desk