HW News Marathi
राजकारण

भुजबळांच्या टोल्याला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

बीड | राम मंदीर बांधण्यापेक्षा शिवसेनेचे दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक बांधा, अशी टीका छगन भुजबळांनी शिवसेनेवर केली होती. दसरा मेळाव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी टीकास्त्र चालवले. त्यात आता भर म्हणजे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर टीका केली. या टीकेवर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चिंता कोणी करु नये. ते होणारच आहे. दैवत बदलणारे आम्हाला शिकवणार का ?” याच दैवताला तुम्ही अटक करायला निघाले होते, असा टोलाही उद्धव यांनी भुजबळांना लगावला आहे.तसेच जे जामिनावर बाहेर पडलेत, तरीही त्यांचे पाय अजून जमिनीवर नाहीत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल बीडमध्ये सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. बीडमध्ये भगवा फडकवायचा असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांना थेट इशाराच दिला आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे. कारण मला राज्य उभारायचे आहे, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर करायला मुहूर्त काढायचा काय ? असेच सुरु राहिले तर लोकशाही मार्गाने हे सरकार पुढे जाऊ शकेल असे वाटत नाही. देशात आणि राज्यात तब्बल ३० वर्षानंतर हिंदू सरकार आले आहे. परंतु लोकांच्या पदरी निराशाच पडली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अशोक चव्हाण यांना भाजपच्या ‘या’ नेत्यांनी दिली ऑफर

Aprna

विधानसभेत १४४ जागांसाठी शिवसेना आग्रही ?

News Desk

…तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा, शिवसेना पुन्हा आक्रमक

News Desk
देश / विदेश

गुजरातमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हाणामारी

Gauri Tilekar

गुजरात | गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील छसरा गावात काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतिच्या निवडणूका पार पडल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी दोन गटात मोठा वाद झाला. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी असल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे. सुरुवातीला वादात सुरुवात झाली नंतर तो वाद हिंसात्मकतेत रूपांतरित झाले आहे.

छसरा गावातील ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत महिला उमेदवार सरपंचपदी निवडणून आल्या. त्यामुळे, पराभूत झालेल्या गटाचा विजयी गटासोबत वाद उफाळून आला शाब्दिक वादाला वेळ न लागता मारामारीत रूपांतर झाले. दोन्ही गटांमध्ये धारदार शस्त्रांनी मारामारी झाली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी आहेत. जखमी झालेल्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच छसरा गावात पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले असून. याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

Related posts

काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन ऑल-आऊट’सारखा कोणताही प्रकार नाही !

News Desk

हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात ! | केंद्रीय मंत्र्याचे अजब विधान

News Desk

विमानांमध्ये हिंदी वर्तमानपत्र आणि मासिकं ठेवा; विमान कंपन्यांना सरकारचा आदेश

News Desk