HW News Marathi
राजकारण

एसईबीसी स्वतंत्र प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण | मुख्यमंत्री

मुंबई | मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्यात येणार आहे. एसईबीसी स्वतंत्र प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनानिमित्ताने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

पुढे मुख्यमंत्र्यांनी असे देखील म्हणाले की, आरक्षणाच्या पुढील कार्यवाहीसाठी मंत्रीमंडळाची उपसमिती नेमण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून या अहवालावर कोणताही सल्ला घेण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारला असून मागासवर्गाच्या तिन्ही शिफारसी राज्य सरकारने स्वीकारल्या आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. हे आरक्षण सामाजिक- शैक्षणिक आणि मागासअंतर्गत आरक्षण देणार आहे.

सामाजिक आर्थिक मागास वर्ग (Socialy economiclay backward class) हा प्रवर्ग आहे. मराठा समाजाला सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास ठरवल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम १५.४ आणि १६.४ मधील तरतुदीनुसार हा समाज आरक्षणासाठी पात्र आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk

एक ‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक सामनातून पवारांवर टीका

News Desk
राजकारण

“हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार”, शिवसेनेचा नवा नारा

News Desk

मुंबई | शिवसेना येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर जाण्याची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्ये दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने “हर हिंदुकी एकही पुकार..पहिले मंदिर फिर सरकार“, असा नवा नारा दिला आहे. अयोध्या दौऱ्याच्या तयारीची माहिती देण्यासाठी महत्त्वाची बैठक आज (१८ नोव्हेंबर)ला सेनाभवनात पार पडली आहे. यावेळी राज्यातील शिवसेनेचे सर्व जिल्ह्याप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

अयोध्या हे छोटे शहर असून राज्यातून मोठ्या संख्येने शिनसैनिक व पदाधिकारी यांनी अयोध्येला येण्यापेक्षा आपल्या भागात आणि राज्यातील ३५० तालुक्यांमध्ये २४ व २५ नोव्हेंबरला महाआरती, रॅली, अयोध्येत राम मंदिर बांधण्याची मागणी शिवसेना करण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करून अयोध्येत राम मंदिराची आठवण सरकारला द्यावी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ठाकरे येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत काय बोलणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

 

Related posts

मोदींना पाठिंबा मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना विरोध । नारायण राणे

News Desk

पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेत आणखी २२ जागा सील करणार

News Desk

‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे?

News Desk