HW News Marathi
राजकारण

#Results2018 : नवज्योत सिंह सिद्धू यांनी केले भाजपचे नामकरण

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात राजकीय नेत्यांकडून विविध राज्यांची नावे बदलण्याचा सपाट लागलेला असताना काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी चक्क भाजपचेच नवे नामकरण केले आहे. “भाजप म्हणजे ‘जीटीयू’ अर्थात ‘गिरे तो भी टांग उपर’ असे आहे, असा टोला नवज्योतसिंह सिद्धू यांनी लगावला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी हे वक्तव्य केले आहे.

“जो हात देशाचे नशीब घडविणार आहे, तो अतिशय मजबूत आहे,” असे म्हणत नवज्योत सिंह सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.”राहुल हे सुरुवातीपासूनच सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत. ते माणुसकीची मूर्ती आहेत”, असेही यावेळी सिद्धू यांनी म्हटले आहे. यावेळीच नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजपशासित तीन राज्यांमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यामुळेच, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०१९ साल संपण्यापूर्वी राम मंदिराचे काम सुरू करावे !

News Desk

शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर केल्या ‘या’ तीन महत्वाच्या घोषणा

Aprna

जळगावमध्ये मतदानाला सुरुवात

News Desk
राजकारण

#Results2018 : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आम्हाला संशय !

News Desk

हैदराबाद | तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या ११९ आहे. त्यामुळे बहुमतासाठी ६० जागा मिळणे आवश्यक आहे. सध्या स्थितीत के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक ९० जागी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस पक्षाला १६ पिछेहाट, एआयएमआयएमला ५, भाजपला १ आणि इतर ३ जागा मिळाल्या आहेत.

तेलंगणा विधानसभेचे निकालांचा कल पाहता निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा संशय काँग्रेस नेता उत्तम कुमार रेड्डी यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच रेड्डी पुढे असे देखील म्हणाले की, व्हीव्हीपॅट स्लिपची देखील पुन्हा मोजणी व्हावी, अशी मागणी केली आहे.

Related posts

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दहाव्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर

Aprna

अखेर राज ठाकरेंच्या सभेला मिळाली परवानगी

News Desk

गायरान जमीन प्रकरणी अब्दुल सत्तारांचा पदाचा दुरुपयोग; तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा! – अजित पवार

Aprna