HW News Marathi
राजकारण

साईबाबा पावले! सिंचन योजनेसाठी शिर्डी ट्रस्टची राज्य सरकारला मदत

शिर्डी | निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी शिर्डी संस्थाकडून मिळणा-या ५०० कोटी रूपयांच्या कर्जाचा मार्ग मोकळा झाला असून दोन टप्प्यात हे कर्ज राज्य सरकारला दिले जाणार आहे. निळवंडे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डी साई संस्थानकडे कर्जाची मागणी केली होती. शिर्डी साई संस्थानचे प्रमुख सुरेश हावरे यांनी हा निर्णय घेत राज्य सरकारला हे कर्ज मंजूर केले आहे.

हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कुठलीही कालमर्यादा घालण्यात आलेली नाही. तसेच राज्य सरकारने आतापर्यंत इतके मोठे कर्ज कुठल्याही संस्थेकडून घेतलेले नाही. १ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्जाच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. त्याचा प्रस्ताव शिर्डी साई संस्थानकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला साई संस्थानने शनिवारी(१ डिसेंबर) मंजुरी दिली असून शिर्डी साई संस्थाने आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महामंडळात याबाबत करार करण्यात आला आहे. निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर नगर जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna

हिंदुस्थानात मुस्लिमांची लोकसंख्या बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढते !

News Desk

भाजपच्या दोन आमदारांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप; निवडणूक आयोगाला तक्रारीचा मेल

Aprna
मनोरंजन

‘नाशिकचा मी आशिक’ चा टिझर लॉन्च

News Desk

नाशिक | केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या निर्मित “नाशिकचा मी अशिक ” हे नाशिकची गाथा सांगणारं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्याचा टिझर नुकताच लॉन्च झाला असून त्याचा व्हिडीओ आत्तापर्यंत ७७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पहिला आहे आणि येत्या काळात ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावरही या टिझरला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळत आहे.

यावरूनच या गाण्याची क्रेझ लक्षात येते. या गाण्यासाठी प्रसिद्ध गायक प्रवीण कुवर आणि हर्षवर्धन वावरे यांनी आवाज दिला असून दिग्दर्शन प्रसाद आप्पा तारकर यांनी केले आहे. गाण्याच्या ओळींवरूनच हे गाणं नाशिककरांच्या मनाचा ठाव घेणारं हे समजून येतं. संगीतकार प्रवीण कुवर यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. तर हे गाणं ध्वनिमुद्रित केले आहे. अवधूत वाडकर यांनी नाशिकच्या भव्यतेचा तसेच निसर्ग सौंदर्याचा विचार करूनच या गाण्याची रचना केली असल्याचे गीतकार मंदार चोळकर सांगतात.

या गाण्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे, बिग बॉस फेम स्मिता गोंदकर तसेच काहे दिया परदेस फेम सायली संजीव, अभिनेत्री मयुरी शुभानंद आणि नाशिकचे कलाकार या गाण्यात झळकणार आहेत. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन करणार असून लवकरच नाशिक येथेच या गाण्याच्या चित्रीकरणाचा शुभारंभ केला जाणार आहे

Related posts

इतिहास महाराष्ट्र दिनाचा

swarit

आगमन बाप्पाचे | दिव्यांग मूर्तिकारावर बाप्पाचा वरदहस्त

News Desk

“स्वातंत्र्यावर बोलण्याची कंगना रनौतची औकात नाही!” 

News Desk