HW News Marathi
राजकारण

साईबाबा पावले! सिंचन योजनेसाठी शिर्डी ट्रस्टची राज्य सरकारला मदत

शिर्डी | निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी शिर्डी संस्थाकडून मिळणा-या ५०० कोटी रूपयांच्या कर्जाचा मार्ग मोकळा झाला असून दोन टप्प्यात हे कर्ज राज्य सरकारला दिले जाणार आहे. निळवंडे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डी साई संस्थानकडे कर्जाची मागणी केली होती. शिर्डी साई संस्थानचे प्रमुख सुरेश हावरे यांनी हा निर्णय घेत राज्य सरकारला हे कर्ज मंजूर केले आहे.

हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कुठलीही कालमर्यादा घालण्यात आलेली नाही. तसेच राज्य सरकारने आतापर्यंत इतके मोठे कर्ज कुठल्याही संस्थेकडून घेतलेले नाही. १ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्जाच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. त्याचा प्रस्ताव शिर्डी साई संस्थानकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला साई संस्थानने शनिवारी(१ डिसेंबर) मंजुरी दिली असून शिर्डी साई संस्थाने आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महामंडळात याबाबत करार करण्यात आला आहे. निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर नगर जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे बबनराव थोरातांच्या ‘त्या’ चिथावणीखोर वक्तव्यामुळे उदय सामंत यांच्या गाडीवर झाला हल्ला

Aprna

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा फोन, म्हणाले…

Aprna

…मग पाटीदारांना आरक्षण का नाही ?

News Desk