HW News Marathi
राजकारण

वैयक्तीक डेटा चोरीसाठी सरकारने आधार कार्ड केले सक्तीचे

मुंबई | आधार कार्ड पॅनकार्ड तुमच्या बँकांशी लिंक करुन तुमची वैयक्तीक माहिती व तुमचा डेटा चोरी करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला. लोकांनी आधारकार्ड पॅन कार्ड लिंक न केल्यामुळे रेशन दुकानदार या गरीब लोकांना धान्य देत नाहीत. रेशन दुकानदार गरीबांसाठी आलेले हे धान्य ब्लॅकने बाजारात विकत असल्याचे देखील निरुपम यांनी यावेळी सांगितले .

सार्वजनिक वितरण प्रणालीमुळे गरीब लोकांना धान्य आणि सरकारी योजनांचा लाभ त्यांना मिळावा म्हणून काँग्रेस सरकारच्या काळात आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु भाजप सरकार आधार कार्ड, पॅन कार्ड लिंकचा गैरवार करत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय

रेशन दुकानात ज्या लोकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नाही त्यांना धान्य दिले जात नाही. या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक नसेल तरीही अशा सर्व रेशन कार्ड धारकांना धान्य देण्यात यावे असा आहे. तरीही राज्य सरकार आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करण्याची सक्ती का करत आहे, असा सवाल निरुपम यांनी यावेळी उपस्थित केला.

आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करुनही धान्य नाही

काही लोकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करुनही रेशन दुकानातून धान्य मिळत नाही. लिंक करण्यासाठी जे बॉयोमॅट्रिक मशीन वापरण्यात येत आहे. या मशीन तसेच यासाठी वापरण्यात येणारे इंटरनेट निकृष्ट दर्जाच्या असल्यामुळे लोकांच्या बोटाचे ठसे उमटत नाहीत. त्यामुळे गरजू लोकांना आपल्या अधिकारांपासून वंचित रहावे लागत आहे. सरकारने आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…धुळे मतदारसंघाबाबत

News Desk

सुजय विखे पाटील शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश

News Desk

महाराष्ट्रातील नेत्यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांची पुस्तके द्यायला हवीत !

News Desk