HW News Marathi
राजकारण

#Results2018 : भाजपने जनतेचा राग समजून आत्मपरिक्षण करावे !

नवी दिल्ली | छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. या विधानसभा निकालानंतर भाजपचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार बोचरी टीका केली आहे. या निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव म्हणजे जनतेचा राग असल्याचे टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.भाजपने जनतेचा राग समजून घ्यावा आणि आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला यावेळी राऊत यांनी भाजपला दिला आहे.

पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल सायंकाळपर्यंत होतील. भाजपची सत्ता असलेल्या तिन्ही राज्यात काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्याने भाजपला धक्का बसला आहे. यापैकी छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपची धूळधाण उडवली आहे. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. उत्तर भारतातील ही राज्ये भाजपसाठी अतिशय महत्त्वाची मानली जात होती. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या दीड दशकापासून भाजप सत्तेत होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपची सत्ता येणे अवघड असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

News Desk

साध्वी प्रज्ञा यांच्यावर ७२ तासांसाठी प्रचारबंदी, निवडणूक आयोगाची कारवाई

News Desk

विद्या चव्हाण यांनी विधानभवनाच्या प्रांगणात रावतेंना का आडविले

News Desk
मुंबई

सेंट झेवियर्समध्ये ‘आमोद’ची ‘पखरण’

News Desk

मराठी वाङ्मय मंडळाच्या दिमाखदार महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई – १९२३मध्ये स्थापन झालेल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे यंदा ९३वे वर्ष. या वर्षात मंडळाने अनेक उपक्रम राबवले. त्यात झेवियर्स महाविद्यालयामध्ये १९,२० आणि २१ जानेवारी रोजी झालेला आमोद हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव विशेष उल्लेखनीय ठरला. या दिमाखदार महोत्सवाला विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मराठी वाङ्मय मंडळ आयोजित या महोत्सवात एकूण दहा स्पर्धा रंगल्या. विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी यात आपली कलाकारी सादर केली. आमोदचे यंदाचे ५वे वर्ष होते. त्याचे मुख्य ठरले स्पर्धांमधली विविधता. ललित कला अंतर्गत पोस्टरबाजी आणि कार्टून फॅक्टरी तसेच साहित्य कला अंतर्गत काव्य नाटुकली या नव्या स्पर्धा होत्या. त्यामुळे त्यांबद्दल विशेष उत्सुकता दिसली. ब. न. पुरंदरे वक्तृत्व स्पर्धा म्हणजे आमोदचे विशेष वैशिष्ट्य. या स्पर्धेच्या विजेत्यांना चांदीचा फिरता चषक देण्यात येतो. यंदा हा मान टी. एम. लॉ कॉलेजने पटकावला. महाराष्ट्राची लोकधारा या लोकनृत्य स्पर्धेत स्पर्धक संघांनी बहारदार सादरीकरणे केली. स्पर्धांतला हा उत्साह पारितोषक वितरण समारंभातही कायम होता. आपआपल्या कॉलेजच्या विजेत्यांना चिअर अप करण्यासाठी एकच जयघोष सुरू होता.

या वर्षी आमोदमधील सर्वच स्पर्धा चुरशीच्या झाल्या. सर्वच कॉलेजांनी अव्वल क्रमांकासाठी मेहनत घेतली. एकपात्री अभिनय आणि वक्तृत्व स्पर्धेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.

आमोदच्या निमित्ताने मराठी वाङ्मय मंडळ च्या वार्षिक अंक ‘पखरण’चेही प्रकाशन झाले. या अंकामध्ये झेवियर्सच्या स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे लेख असून त्यांच्या लेखन कौशल्याला वाव देणारा हा उपक्रम होता.

Related posts

फिलिपिन्सच्या ‘त्या’ नागरिकाचा मृत्यू कोरोनामूळे झाला नव्हताच…

swarit

निवडणुक खर्चावर मर्यादा

News Desk

मुंबई क्रिकेट असोसिएशनने पोलीस बंदोबस्ताचे १३.४२ कोटी थकविले

swarit