HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

कीर्तिकरांना आणखी काय हवे होतं? संजय राऊतांचा सवाल

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यापासून आजतागायत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकापाठोपाठ एक धक्के देण्याची मालिका सुरूच ठेवली असल्याचं दिसत आहे. आधी आमदार मग खासदार शिंदे गटात गेल्याने ठाकरेंची सेना खिळखिळी झाली आहे. अशातच शुक्रवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. शुक्रवारी त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला असून हा  ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

गजानन कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश करताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं म्हणजे शिवसेनेचं भवितव्य धोक्यात आहे. या संदर्भात आम्ही उद्धव ठाकरेंना प्रस्ताव दिला होता. आम्हाला वाटत होतं की त्यांच्या या धोरणात बदल होईल, पण तसं काही झालं नाही, अशी प्रतिक्रिया कीर्तिकरांनी दिली. तर त्यांच्या या आरोपांवर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. कीर्तीकरांच्या बोलण्याला आता काहीही महत्त्व नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, “आता कीर्तिकरांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. कीर्तिकर हे आमचे जेष्ठ नेते होते. या वयात पक्षाने त्यांना आणखी काय देणं अपेक्षित होतं? त्यांचा हा दुर्दैवी निर्णय आहे, असं मी म्हणणार नाही. पण, कीर्तीकरांसारखे नेते सर्व काही प्राप्त करून पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते. कीर्तीकरांना पक्षाने आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं तरीही त्यांना आणखी काय मिळणं अपेक्षित आहे?”, असा सवाल राऊतांनी केला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “कठीण काळात कीर्तिकर आमचा पक्ष सोडून गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. ती काही शिववाणी नाही. आपण गेलात आपल्याला शुभेच्छा. अंधेरीच्या निवडणुकीत दिसलं की दिशा कोणाच्या दिशेने आहे. हिंमत असती तर निवडणूक लढायची होती. मला जेलमध्ये टाकलं गेलं तरीही मी पक्षासोबत आहे. मी पक्ष सोडलेला नाही” असंही राऊतांनी म्हंटलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंच्या सत्कारावर आक्षेप; राज्य सरकारकडे कारवाईची मागणी

News Desk

आम्ही बहिण-भाऊ आहेत, आमच्या नात्यात पक्ष आणि राजकारण येऊच शकत नाही –  पंकजा मुंडे

News Desk

सोलापूरात ‘एक मराठा…लाख मराठा’चा आवाज घुमला, मराठ्यांचा आक्रोश मोर्चा ! अनेकांची धरपकड

News Desk