HW News Marathi
राजकारण

चंद्रकांत पाटील हे पुरात वाहून आलेले उमेदवार !

जळगाव । “चंद्रकांत पाटील हे पुरात वाहून आलेले उमेदवार आहेत”, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील शुक्रवारी (११ ऑक्टोबर) जळगाव येथे बोलत होते. “चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर काय करायची ती टीका करू देत. त्यांना कोणी गांभिर्याने घेत नाही”, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

“राज्य सरकारला विरोधी पक्षाची भीती वाटत असून अमित शहा प्रत्येक सभेमध्ये शरद पवार यांना लक्ष करत आहेत. याचाच अर्थ राष्ट्रवादी अतिशय ताकदीने भाजप आणि शिवसेनेचा प्रतिकार करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षापेक्षा विरोधी पक्षाची ताकद विधानसभेमध्ये मोठी असेल”, असा दावाही यावेळी जयंत पाटील यांनी केला आहे.

खाजगीकरणाबाबत बोलताना पुढे जयंत पाटील म्हणाले की, “केंद्र सरकारची आर्थिक अवस्था बिकट असून सरकार प्रायव्हेटायझेशन करत आहे. जिओसाठी म्हणून गेल्या २ वर्षांपासून एमटीएनएल बीएसएनएलचे खच्चीकरण सुरू असल्याचे जयंत पाटील म्हणाले. रेल्वेचा आर्थिक बजेट बंद करण्याचा अति शहाणपणा केंद्र सरकारने केला. त्यामुळे रेल्वेचे नेमकं काय चाललंय ? हे नागरिकांना कळत नाही”. सरकार रेल्वेला खासगीकरणाकडे नेत असल्याचा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस पक्षाने कारवाई करत सत्यजीत तांबे यांना केले निलंबित; नाना पटोलेंची माहिती

Aprna

२३ मे हा दिवस ‘मोदी दिन’ म्हणून साजरा व्हावा !

News Desk

अवनीच्या हत्येची निष्पक्ष चौकशी व्हावी !

News Desk