HW News Marathi
राजकारण

शरद पवार यांची भाजप सरकारवर सडकून टीका

पुणे | भाजप सरकारचा कारभार म्हणजे ‘आम्ही करू तीच पूर्वदिशा‘ असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.’सीबीआय ही स्वतंत्र यंत्रणा आहे. या सरकारने सीबीआयच्या प्रमुखांना काढण्याचा निर्णय एका रात्रीत घेतला. यावरून हे स्पष्ट लक्षात येते कि, ‘आम्ही सांगू तीच पूर्व दिशा’ असा या सरकारचा कारभार आहे. हे देशासाठी अत्यंत घातक असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

सीबीआयच्या प्रमुखांना एका रात्रीत काढण्याचा मोदी सरकारच्या या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा आणि टीका झाल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील याप्रकरणी मोदी सरकारवर टीका केली होती. ‘सीबीआयच्या संचालकांनी राफेलवर प्रश्न उपस्थित केले होते. म्हणूनच, त्यांना एका रात्रीत देशाच्या चौकीदाराने सीबीआयच्या संचालकांना हटविले,’ अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी सिद्धूंना क्लीन चिट 

News Desk

फडणवीसांची तुलना थेट श्री रामाशी करून दिल्या भाजपच्या ‘या’ आमदाराने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Aprna

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटानंतर ठाकरे गटाचा आज टीझर लाँच

Aprna