HW News Marathi
राजकारण

…म्हणूनच सीबीआयच्या संचालकांना हटविले, राहुल गांधींची मोदींवर टीका

नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संवाद साधताना सीबीआय प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘सीबीआयच्या संचालकांनी राफेलवर प्रश्न उपस्थित केले होते. म्हणूनच, काल रात्री देशाच्या चौकीदाराने सीबीआयच्या संचालकांना हटविले,’ अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

सीबीआयचे संयुक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची अंतरिम प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. सीबीआयच्या (केंद्रीय अन्वेषण विभाग) सीबीआय संचालक आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वादाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ‘राफेल प्रकरणात मोदी सरकारच्या अडचणी वाढल्यामुळेच सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे’, असे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, हे सीबीआयचे प्रकरण सरकारच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील आरोपाची चौकशी सरकार करणार नसून दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी चौकशी करणार आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#MarathaReservation : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

रुपाली ठोंबरेंनी फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी नेमक्या काय म्हणाल्या…

Aprna

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिला व बालविकास विभागाचा घेतला आढावा

Aprna
देश / विदेश

सरकारला चौकशीचा अधिकार नाही, एसआयटी करणार चौकशी

Gauri Tilekar

नवी दिल्ली| देशातील प्रमुख गुन्हे तपास संस्थामधील दोन सर्वोच्च अधिकाऱ्यावर लाचखोरीच्या आरोप करण्यात आला होता या आरोपांच्या चौकशी केंद्रीय दक्षता आयोगाच्याकडून (एसआयटी) केली जाणार आहे.सीबीआयमधील लाचखोरी प्रकरणाने गोंधळ झाला आहे.सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकमेकांवर लाचखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाचा तपास कोण करणार, हा प्रश्न सरकारसमोर आहे. हे प्रकरण सरकारच्या कक्षेत येत नसल्याने सीबीआयच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील आरोपाची चौकशी सरकार करणार नसून दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी चौकशी करणार आहे, असं जेटलींनी स्पष्ट केले.

 

याप्रकरणी केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत सीबीआयमध्ये विचित्र स्थिती निर्माण झाली असून आरोपांची चौकशी करण्याचे अधिकार सरकारला नाही असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माहिती दिली आहे.

Related posts

#SushanSinghRajput – पाटण्याहून आलेले एसपी विनय तिवारी बिहारला परतणार

News Desk

आता राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात !, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

News Desk

श्रीनगरच्या रुग्णालयातून दहशतवादी फरार

News Desk