HW News Marathi
राजकारण

नको ती लफडी केली म्हणूनच ईडी अन् येडी त्यांच्या मागे !

अहमदनगर । “नको ती लफडी केली म्हणूनच ईडी अन् येडी यांच्या मागे लागली आहे़”, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला. “आम्हाला विकास करायचा आहे, असे कारण देऊन काही जणांनी पक्ष सोडला. जेव्हा १४ वर्षे त्यांच्याकडे मंत्रीपद होते तेव्हा त्यांना विकास करायचा सुचला नाही का ?”, असा टोला देखील शरद पवार यांनी लागावला. विधानसभेच्या दृष्टीने शरद पवार हे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. यावेळी अहमदनगरमध्ये पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

“आम्हाला नोटीस मिळाली आहे, आमच्या संस्थेची आणि आमची चौकशी सुरू झाली आहे, आम्हाला विकास करायचा आहे़ अशी कारण देत काही जणांनी पक्ष सोडला. पण त्यांनी ही असली नको ती लफडी केली म्हणूनच ईडी आणि ईडी त्यांच्या पाठी लागली. १४ वर्षे स्वतःकडे मंत्रीपद असताना त्यांना विकास करायला सुचला नाही का ?”, असा खोचक सवाल देखील शरद पवार यांनी यावेळी केला.

शरद पवार यांनी यावेळी सरकारवर देखील टीका केली आहे. “या सरकारच्या कार्यकाळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़. मात्र, देशाचे गृहमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाही. सध्या नगरमधील कारखाने दोन महिनेही चालणार नाही आशा परिस्थितीत आहेत. या सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे देशातील कारखाने बंद पडून लाखो जण बेरोजगार झाले आहेत”, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेना युतीला पाठिंबा

News Desk

“…त्यांच्या दृष्टींने संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन”, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

Aprna

पाकिस्तानच्या दिवाळखोरीचा ‘हा’ पुरावा आहे !

News Desk