HW News Marathi
राजकारण

पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रमध्ये बदल नक्की घडेल !

औरंगाबाद | ‘पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रमध्ये बदल नक्की घडेल,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पवार यांनी औरंगाबादच्या पत्रकार परिषेदत बोलताना म्हणाले. लोकसभा निवडणुकीआधीही मोदी सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी होती. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची घटना घडली आणि परिस्थिती बदलली, असे वक्तव्य पवारांनी केले.

यानंतर पवार पुढे म्हणाले की, “पुलावामा हल्ल्याबद्दल लष्करी अधिकाऱ्यांनाच शंका होती. हा हल्ला नेमका घडला का घडवला. मात्र, हा देशाचा विषय आहे. म्हणून त्यावर बोलू नका, असे मी स्पष्ट सांगितले होते. पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रातही बदल नक्की होईल, असा विश्वास पवारांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.

मराठवाड्यात पूर्ण फिरलो असात शेतकरी आणि तरूणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सभेदरम्यान पवार म्हणाले, महाराष्ट्र दौऱ्याच्या निरोपावरच्या वेळी कोणतेही मोठे नियोजन न करता लोकांकडून मिळालेला अभूतपूर्वी प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी म्हणाले. तसेच नाशिकमधील पवारांच्या भाषणावर खोचक शब्दात टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये आर्थिक मंदीसंदर्भात काही बोलेने अपेक्षित होते. मात्र, मोदींनी त्याबद्दल काही बोले नाही, असे पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत माझ्यावर टीका केली. “पाकिस्तानची मी स्तुती केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पाकिस्तानमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे, असे सत्ताधारी व सैन्य ज्यांच्या हातात ते सैन्याधिकारी सतत भारताविरोधात बोलतात, वातावरण तयार करतात,असे मी म्हणालो होतो.”

“आपल्या हातात सत्ता कायम राहावी, अधिकार कायम राहावेत याची ते काळजी घेतात. पाकिस्तानचे सत्ताधारी, पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी हे सगळेजण पाकिस्तानच्या जनतेला धोका देतात, हे मी बोललो. आणि मोदी सांगतात मी, पाकिस्तानची स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे, “असा सवालची पवारांनी विचारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaCase | अयोध्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय देणार निकाल

News Desk

सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली; सर्व प्रशासकीय बैठका रद्द

Aprna

Chhattisgarh Assembly Elections 2018 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

News Desk