HW News Marathi
राजकारण

राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्धवस्त करुन पवारांचे राजकारण संपविणार !

मुंबई | भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोकाचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उध्वस्त करून शरद पवार यांचे राजकारण संपविण्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतके खासदार असूनही देशातील राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या आणि केंद्राच्या राजकारणात सतत ढवळाढवळ करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्धवस्त करुन आम्ही शरद पवारांचे राजकारण संपविणार, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते.

दुष्काळग्रस्तांच्या भावनेशी खेळणाऱ्या राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत आपण त्यांची जागा दाखवून देणार असल्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी म्हटले आहे. “माढा मतदारसंघातून आपला पराभव होईल अशी चाहूल लागल्यानेच शरद पवार यांनी माघार घेत संजय शिंदे यांना बळीचा बकरा बनवला आहे. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत आमच्या विरोधात असणारे मोहिते-पाटील आणि अ‍ॅड. शहाजीबापू पाटील कुटुंबीय आगामी निवडणुकीत भाजपसोबत आहेत”, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…कल्याण मतदारसंघाबाबत

Atul Chavan

जाणून घ्या… आतापर्यंत गांधी घराण्याव्यतिरिक्त झालेले काँग्रेसचे अध्यक्ष

News Desk

#LokSabhaElections2019 : सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या

News Desk