HW News Marathi
राजकारण

निवडणूक येताच सेना-भाजप श्रीरामच्या भूमिकेत दिसतात !

औरंगाबाद |निवडणूक येताच शिवसेना आणि भाजप श्री रामच्या भूमिकेत दिसतात. हाती सत्ता असताना सहाशे कोटी रुपयांची कार्यलये बांधली जातात. मात्र आम्हला या गोष्टींपेक्षा त्या दुष्काळग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या ,नागरिकांची तसेच गरीबीला सामोरे जाणाऱ्यांची काळजी वाटते, अशा शब्दात राष्ट्रावादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी सेना-भाजपवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत चर्चा करताना त्या म्हणाल्या की, सर्वांना नको ता वाद घालण्यापेक्षा नको त्या चर्चा करण्यापेक्षा गरिबांना सवलती शेतकऱ्यांना योग्य त्या योजना मिळतील. शैक्षणिक शुल्क माफ करण्यासोबत शेतकऱयांना कर्ज माफ करावेत असे मत सुप्रिया यांनी व्यक्त केले आहे.
तसेच सुप्रिया यांनी सध्या सुरू असेलेल्या मीटु मोहिमे संबंधित देखली बोलताना म्हटल्या की, महिलांवर लैगिंक शोषणा झालेल्या यांनी निर्भिडपपणे समोर येऊन त्यांच्यावरील अत्याचाराचे कथन करावे. परंतु या मोहिमेतील प्रत्येक महिला खरच-बोलत असे नाही, काही महिला खोटे बोलू शकतात. तसेच विशाखा समिती महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. परंतु तिची अंमलबजावणी आपल्याकडे योग्य रित्या होत नाही. आमची सत्ता असतांना आम्ही मुलींच्या सुरक्षेसाठी महाविद्यालय आणि शाळांमध्ये तक्रार समिती सुरु केली होती. जी या सरकारने सत्तेत येताच बंद केली. मी टू चळवळ गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ती केवळ बातम्यांपूर्ती किंवा काही दिवसांपूर्ती मर्यादित राहता कामा नये, असे म्हणाल्या आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेसला कमी जागा जिंकण्यातही राहुल गांधींचीच मदत होणार !

News Desk

जळगावमध्ये मतदानाला सुरुवात

News Desk

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk