HW News Marathi
राजकारण

एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी संपात सहभागी झाल्यामुळे जाणार नाही !

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चर्चेच्या मार्गाने मिटवण्यात येईल,या संपात सहभागी झालेल्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनानंतर उद्धव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प विलीन केला जावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याबद्दलचा ठराव मंजूर झालेला आहे. सध्या बेस्ट उपक्रम तोट्यात सुरू आहे. हा तोटा कमी करण्याचा विचार आहे. बेस्ट ही सेवा असल्याने फायद्यात आणण्याचा तितका आग्रह नाही. परंतु ना नफा ना तोटा तत्त्वावर ही सेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कमीत कमी तोट्यात बेस्ट उपक्रम चालवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी बेस्टमध्ये काही सुधारणादेखील सुचवल्या आहेत, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्र करण्यासह वेतन कराराचादेखील प्रश्न आहे. या सर्व मागण्यांबद्दल चर्चा सुरू आहे. तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांनी अवाजवी मागण्या करू नयेत. आधीच बेस्ट प्रशासनाची तिजोरी रिकामी आहे. अवास्तव मागण्या केल्यास एक वेळ अशीही वेळ येईल की बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारही देता येणार नाही, असे देखील उद्धव ठाकरे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्यभरात नाराजी

Aprna

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार

News Desk

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

News Desk