HW News Marathi
राजकारण

शिवसेनेकडून वनगांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर

पालघर | पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पालघर येथे गुरुवारी (आज) झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगांचा पराभव झाला असला तरी शिवसेनेकडून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी वनगा यांनाच जाहीर करण्यात आली आहे. पालघरमधील पराभवानंतर घेतलेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.

पोटनिवडणुकी वेळी श्रीनिवास यांना फक्त १५ दिवस मिळाले होते, पण आता ८-९ महिने मिळाले आहेत. आता खासदार झाल्याशिवाय गप्प बसायचे नाही,असा आदेश उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास यांना दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीनंतरही लोकसभा स्वबळावरच लढण्याचे संकेत दिले. आता नाटकं सुरु आहेत, खरंच पिक्चर अभी बाकी आहे, २०१९ चा हिरो तूच, असेही उद्धव यावेळी म्हणालेत. तसेच पालघर लोकसभेचा संघटक म्हणून श्रीनिवास वनगा यांची नियुक्ती करण्यात देखील यावेळी करण्यात आली आहे.

‘साम दाम दंड भेद वाल्यांना श्रीनिवास यांनी घाम फोडला. साम दाम दंड भेदचा वापर करुन एवढी मते मिळाली असतील, तर हा आमचा विजय आहे. सहा लाख मतदान हे भाजपच्या विरोधात झाले. खिलाडूवृत्तीने हार स्वीकारावी लागते, पण मी कोणत्याच पद्धतीने पराभव मान्य करायला तयार नाही. तो माझा विजयच मानतो, असे उद्धव म्हणाले. मतदार मतदानासाठी रांगा लावून उभे होते परंतु त्यांना मशिन बंद दिसल्या. उन्हामुळे जर यंत्रे बंद पडत असतील, तर आधी का तपासणी केली नाही? आयोग म्हणून काय केले? पैसे पकडले, नावे सागितली, पण काहीच केले नाही. हेच शिवसैनिकांविरोधात घडले असते तर? हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांवर बंदी घातली होती, मग पैसे वाटले म्हणून काय केले असते? नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली याला लोकशाही म्हणतात? असे संतप्त सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केले .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हार्दिक पटेलने तयार केले स्वत:चे मृत्यूपत्र ?

News Desk

लोकसभेचा प्रचार संपला, ‘नमो टीव्ही’ देखील बंद

News Desk

ठाण्यातून राष्ट्रवादीचे ‘गणेश नाईक’ यांना उमेदवारी मिळणार का ?

News Desk
मुंबई

महापौरांचा मुख्यमंत्र्यांवर पावसाळी घणाघात

swarit

मुंबई | मुंबईत पावसाला जोरदार सुरूवात झाली असुन सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आरोप-प्रत्यारोपांना प्रारंभ झाल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. मुंबईत पावसामुळे दरवर्षी पाणी तुंबते व दरवर्षी त्यावर उपाय योजले जातात ज्यामुळे शिवसेना-भाजप एकमेकांना पाण्यात पाहते. याच मुद्दयावरुन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे.

‘मंत्रालयात महापालिकेच्या प्रश्नांबाबत बैठक असेल तर पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवले जाते. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या बाबत जी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत मुंबईच्या महापौरांना आमंत्रित केले असते, तर राज्य सरकारच्या अखत्यारित येणारी जी प्राधिकरणं कामेकरत नाहीत, त्यांच्याविषयी प्रश्न मांडले असते. म्हणजे पावसाळ्यात मुंबईकरांना होणारा त्रास कमी झाला असता’, असे महापौर म्हणाले.

महाराष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करु शकतात, मात्र मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून महापौरांना बैठकीतील निर्णयांबाबत माहिती देणे आवश्यक असते व मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा जर पालिका अधिकाऱ्यांवर दबाव असेल तर कामात व्यत्यय येऊ शकतो तसेच मुख्यमंत्री जाणीवपूर्वक कामात हस्तक्षेप करत आहेत का हे समजत नसल्याचेही महाडेश्वर म्हणालेत. तसेच मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहता हे देखील हुकूमशहा असल्याचा घणाघात महाडेश्वरांनी केला आहे.

 

Related posts

मुंबई महापालिका कर्मचा-यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर

News Desk

दक्षिण मुंबईत झाड कोसळल्याने वाहतूकीचा खोळंबा

News Desk

अल्पवयीन मुलावर १५ मित्रांकडून लैंगिक अत्याचार

News Desk