HW News Marathi
राजकारण

सेना-भाजपचे नेते आमच्या संपर्कात | अशोक चव्हाण

मुंबई । अनेक चांगली माणसे चुकीच्या पक्षात गेली होती, ती आता परत येऊ इच्छितात. त्यांना काँग्रेसमध्ये सन्मानाने प्रवेश दिला जाईल. योग्यवेळी त्या व्यक्तींची नावे जाहीर करू,असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ,खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवसेना व भाजपाचे काही खासदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

भाजपा नेते एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले, तर त्यांना ही आम्ही प्रवेश देऊ असे ही ते म्हणाले. विद्यमान खासदार परत आल्याने काँग्रेस, राष्टवादीच्या जागा वाटपावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.अनेक जण भाजपात गेले ,पण तेथे गेल्यावर त्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे वैतागले आहेत. असे चव्हाण म्हणाले .

जलशिवार योजना फोल ठरल्याचा आरोपसुद्धा चव्हाण यांनी केला. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्चुनही भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. जलशिवार योजना हा एक घोटाळा आहे.अशी टीका चव्हाण यांनी भाजप सरकारवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांच्या कुटुंबातील एकही उमेदवार लोकसभेत जाणार नाही !

News Desk

कॉंग्रेसचे नेते सी. पी. जोशी यांचे वादग्रस्त विधान

News Desk

INX Media Case : पी. चिंदबरम यांना ईडी अटक करू शकत नाही

News Desk