HW News Marathi
राजकारण

सेना-भाजपचे नेते आमच्या संपर्कात | अशोक चव्हाण

मुंबई । अनेक चांगली माणसे चुकीच्या पक्षात गेली होती, ती आता परत येऊ इच्छितात. त्यांना काँग्रेसमध्ये सन्मानाने प्रवेश दिला जाईल. योग्यवेळी त्या व्यक्तींची नावे जाहीर करू,असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ,खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवसेना व भाजपाचे काही खासदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

भाजपा नेते एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले, तर त्यांना ही आम्ही प्रवेश देऊ असे ही ते म्हणाले. विद्यमान खासदार परत आल्याने काँग्रेस, राष्टवादीच्या जागा वाटपावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.अनेक जण भाजपात गेले ,पण तेथे गेल्यावर त्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे वैतागले आहेत. असे चव्हाण म्हणाले .

जलशिवार योजना फोल ठरल्याचा आरोपसुद्धा चव्हाण यांनी केला. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्चुनही भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. जलशिवार योजना हा एक घोटाळा आहे.अशी टीका चव्हाण यांनी भाजप सरकारवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राजस्थानच्या उर्वरित मतदारसंघासाठी मतदानाची तारीख जाहीर

News Desk

भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी घातले लोटांगण

Gauri Tilekar

मनोहर भिडे यांच्या जाहीर मेळाव्यासाठी परवानगी नामंजूर करण्याची मागणी

News Desk
राजकारण

मला सेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, राज्य उभारायचे आहे | उद्धव ठाकरे

Gauri Tilekar

बीड | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बीडमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बीडमध्ये भगवा फडकवायचा असल्याचे म्हणत पंकजा मुंडे यांना थेट इशाराच दिला आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे, कारण मला राज्य उभारायचे आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत बहिणीविरुद्ध उमेदवार देणार असे म्हणणाऱ्या उद्धव यांनी यंदा मात्र बीडमध्ये उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

गोपीनाथ मुंडेंसाठी आम्ही एक एक मतदारसंघ सोडला. परंतु आता मला बीडमध्ये सर्व जागांवर भगव्याचे राज्य पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील दुष्काळ जाहीर करायला मुहूर्त काढायचा काय ? असेच सुरु राहिले तर लोकशाही मार्गाने हे सरकार पुढे जाऊ शकेल असे वाटत नाही. देशात आणि राज्यात तब्बल ३० वर्षानंतर हिंदू सरकार आले आहे. परंतु लोकांच्या पदरी निराशाच पडली आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, काल (सोमवारी) केंद्र आणि राज्यात सत्तेत राहून भाजपवरच टीका करणाऱ्या शिवसेनेला भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी अल्टिमेटम दिले होते. त्यामुळे आता ‘सत्तेला कधीही लाथ मारू’ असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना याबाबत आता अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले होते. मात्र अमित शहा यांच्या या अल्टिमेटमवर उद्धव ठाकरे यांनी अद्याप भाष्य केलेले नाही.

Related posts

“… माझ्यावर हल्ला करण्याचा कट”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Aprna

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही – गिरीश बापट

swarit

“मी राजीनामा देतो आणि परत निवडून येतो,” आदित्या ठाकरेंच्या टीकेला सत्तारांचे प्रत्युत्तर

Aprna