HW News Marathi
राजकारण

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. दिल्ली सरकार शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव देण्याचा निर्णय घेईल, असे आश्वासनही केजरीवाल यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे याबाबत जनतेच्या सूचनांचे देखील स्वागत केले जाईल, असेही केजरीवाल म्हणाले.

शेतकऱ्यांना गहू या पिकासाठी २६१६ रुपये तर धान्यासाठी २६६७ रुपये एमएसपी (किमान आधारभूत किंमत) लागू करण्याचे प्रस्तावित असल्याचे देखील केजरीवाल यावेळी म्हणाले. दरम्यान, kisansuggestions@gmail.com किंवा jdadev.delhi@nic.in या ई-मेल आयडीवर लोकांना त्यांच्या सूचना पाठविण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर २००४ साली ‘नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स’ची स्थापना करण्यात आली होती. या स्वामिनाथन आयोगाच्या काही महत्त्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे :

१) शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव मिळावा

२) शेतकऱ्यांना कमी दरात चांगल्या दर्जाची बियाणं मिळावीत.

३) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गावात ‘व्हिलेज नॉलेज सेंटर’ची स्थापना करावी.

४) महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जावे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी चर्चेसाठी शरद पवारांच्या निवासस्थानी

News Desk

एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत ?

News Desk

इम्रान खानच्या गुगलीवर सुषमा स्वराज यांची बॅटिंग

News Desk