HW News Marathi
राजकारण

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

मुंबई | भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकना शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे मला दु:ख झाले, अशी खंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. पाटलांनी पनवेलमधील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीत उद्घाटना वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. परंतु, भाजपने हा व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट केली आहे. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (24 जुलै) माध्यमांशी बोलताना  पोटातील मळमळ ओठावर आली, असे म्हणत त्यांनी टोला लगावाल.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोरोना काळात राज्यातील जनतेचे खूप हाल झाले असून सरकारविरोधी कोणी टीका टिप्पणी केली तर त्यांना तुरुंगात डांबले गेले. गेल्या अडीच वर्षातील राज्यातील परिस्थिती पाहिल्यानंतर सत्तांतर होण्याची गरज होती आणि तसा बदल झाला आहे. या बदलामुळे योग्य संदेश जाईल आणि चांगल्या निर्णयांवर स्थिरता येईल, असा एक नेता देण्याची गरज होती. यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मनावर दगड ठेवून फडणवीस उपमुख्यमंत्री आणि शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या निर्णाममुळे सर्वांना दु:ख झाले आहे. राज्यात वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष कार्यकाळपूर्ण करणारे फडणवीस हेच मुख्यमंत्री राहिले होते. परंतु, आता फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आहे, हा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला असून फडणवीसांना हा निर्णय मान्य देखील केला.”

राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. भाजपमध्ये नाही तर देशातही हीच परिस्थिती आहे. परंतु, मी चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन करतो. सध्या ते पुण्यात राहत असतात, कोल्हापूरशी संबंध फारसा येत नसतानाही त्यांनी आपले कोल्हपूरचे पाणी दाखवले. पाटलांच्या पोटातील मळमळ ओठावर आली आहे. त्यामुळे पाटलांनी हा खुलासा करावा लागला. ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

News Desk

विधान परिषदमधील मतदान प्रक्रियेसाठी शिवसेनेची रंगीत तालीम

Aprna

दिग्गज नेत्यांच्या भाषेची पातळी घसरली, महाराष्ट्रात ‘चड्डी’चे राजकारण

News Desk