HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारच्या इराद्याला कोर्टाच्या निर्णयामुळे चाप | अशोक चव्हाण

मुंबई | आधारकार्ड आणि अनुसूचित जाती जमाती यांच्या पदोन्नती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिले. याच विषयाला अनुसरून काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या निर्णयाचे स्वागत करत ‘या निर्णयामुळे मोदी सरकारच्या हिरड्यांना चाप बसला’ असे सांगत मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले , यूपीए सरकारचा आधार कार्ड वापराचा इरादा चांगला होता पण नंतर भाजपने व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणायचा प्रयत्न केला. आधार कार्ड सक्ती केली जात होती ती चुकीची होती. आता कोर्टाच्या आदेशाने तरी सर्वसामान्यांच्या अधिकारावर गदा येणार नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत ! मोदी सरकारच्या इराद्याला कोर्टाच्या निर्णयामुळं चाप बसला !

तसेच पदोन्नतीतील आरक्षणावर अशोक चव्हाण म्हणतात कि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारांना पदोन्नतील आरक्षणाबाबत निर्णय घेता येईल. तसेच विकेंद्रीकरण झाल्यामुळं इतर घटकांना न्याय देताना अडचण येणार नाही . कोर्टाच्या निर्णयाने एसएसटीला बढतीत आरक्षण देताना सरकारला अधिकार राहिल ही चांगली गोष्ट आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार

Aprna

मोदीजी लढाई संपली असून तुमची कर्म तुमची वाट पाहत आहे !

News Desk

मित्रपक्षावर अवलंबून न राहता स्वबळावर उमेदवार निवडून आणणारा !

News Desk
देश / विदेश

…भगतसिंग नास्तिक होते ?

News Desk

गौरी टिळेकर | क्रांतिकारी भगतसिंग हे सुरुवातीपासून नास्तिक नव्हते. परंतु वयाच्या १५ व्या वर्षी समज आल्यानंतर त्यांना समाजातील रूढी-परंपरा अत्यंत चुकीच्या आणि अन्यायकारक आहेत याची जाणीव होऊ लागली. त्यांनी समाजातील अशा अन्याकारक रूढी-परंपरांवर टीका करायला आणि विरोध करायला सुरुवात केली. लोकांना त्यांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी यावर ‘मी नास्तिक का झालो?’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी नास्तिकत्त्वाची व्याख्या लिहिली आहे.

“जो देवावर विश्वास नाही असे म्हणतो तो खरा नास्तिक नाही. कारण ज्या देवावर तो अविश्वास दाखवत असतो त्याच देवाचे अस्तित्व तो अप्रत्यक्षपणे मान्य करीत असतो. पण खरा नास्तिक तोच असतो जो देवाचे अस्तित्वच नाकारत असतो.” ते स्वतः जरी नास्तिक होते तरीही त्यांनी नेहमीच इतर धर्मांचा आदर केला. “देव कुठे असतो ?” असा प्रश्न ते ज्यावेळी विचारत त्यावेळी त्यांना अनेक वेगवेगळी उत्तरे मिळत. ही उत्तर ऐकून त्यांनी Philosophy is the limitation of human knowledge” असे म्हटले होते.

असे म्हटले जाते कि, ज्यावेळी भगतसिंग यांना फाशी देण्यात येणार होती त्यावेळीदेखील त्यांनी देवाची प्रार्थना केली नाही. याउलट ते त्यावेळी देखील लेनिन यांचे State and Revolution” हे पुस्तक वाचत होते.

मी नास्तिक का झालो ? (भगतसिंग यांच्या पुस्तिकेतून)

मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून काही पोलीस अधिकारी माझे मन वळवू पाहत होते. पण मी तर नास्तिक आहे. मी नास्तिक असल्याची बढाई केवळ शांततेच्या व आनंदाच्या काळातच मारू शकतो, की कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहू शकतो याची माझ्यापुरती कसोटी मला घ्यावयाची होती. बर्‍याच विचारांती मी हा निर्णय घेतला होता, की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो.

कसोटीच्या क्षणीदेखील फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. कारण यावेळी आपला सर्व गर्व पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्धांना बेफिकिरीने धुत्कारू शकत नाही आणि कोणी असे केलेच तर आपण असा निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नाही तर याहून दुसरी अशी काही शक्ती आहे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. केवळ आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?

 

Related posts

मॉनिटर, टीव्हीसह अन्य अनेक वस्तूंवरील जीएसटीत घट

News Desk

गोपीनाथ मुंडे अन् शरद पवार दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्ताने परळीत बॅनरबाजी

News Desk

भारतीय जवान दहशतवाद्यांमधील चकमकीत एक जवान शहीद

swarit