HW News Marathi
राजकारण

युती करायची की नाही हे जनता ठरवेल !

मुंबई |युती करायची की नाही हे जनता ठरवेल,” असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरच्या जाहीर सभेत केले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी काल (२४ डिसेंबर) झालेल्या बैठकीत त्यांनी बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एनडीएने बिहारमध्ये जागावाटपवर शिक्कामोर्तब केला आहे. बिहारनंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये युती होणार का? या चर्चा रंगू लागल्या होत्या. या चर्चेला पंढरपूरच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी पुर्णविराम दिला आहे.

जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवायला निघाले होते, त्यांच्यासमोर भाजपने गुडघे टेकलेत. भाजप आज या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसला आहे, असे सांगतानाच राम मंदिराबाबत नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान त्यांनी दिले. मोदींनी राम मंदिराबाबत संसदेत चर्चा घडवून आणावी. माझे तुम्हाला आव्हान आहे. मग कळेल एनडीएतील कोणते घटक पक्ष तुमच्या बाजूने उभे राहतात, असा चिमटाही त्यांनी काढला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे

News Desk

पूनम महाजन विलफुल डिफॉल्टर, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

News Desk

दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवत आहेत, भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याची टीका अन् निलंबन

News Desk