HW News Marathi
राजकारण

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आठवले जाणार सर्वोच्च न्यायालयात

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी कामकाजात दलित शब्द वापरण्यास बंदी घालणे योग्य असून मीडियामध्ये दलित शब्द वापरण्यावर बंदी घालणे योग्य नाही. दलित शब्द उच्चारण्यास कुणावर बंदी आणणे तथा वृत्तपत्रांमध्ये, मिडियामध्ये दलित शब्द वापरण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाशी आपण सहमत नाही.याबाबत नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध रिपब्लिकन पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जाहीर केले. मीडियामध्ये दलित शब्द वापरण्यास बंदी आणणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.

दलित शब्दाच्या सार्वजनिक वापरावर ; बोलण्यावर; मीडियातील बातम्यांमध्ये दलित शब्दावर बंदी आणणे योग्य ठरणार नाही. दलित हा शब्द फक्त अनुसूचित जातींसाठी वापरला जात नाही. दलित शब्दाचा अर्थ व्यापक अर्थाने आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वंचित शोषित पीडित समस्त वर्गासाठी तथा आदिवासींच्या अंतर्भावासह दलित शब्द वापरला जातो. जे लोक आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत पीडित आहेत शोषित आहेत ते कोणत्याही जाती धर्माचे असोत त्यांच्यासाठी आम्ही दलित शब्द वापरून भारतीय दलित पँथर हे संघटन महाराष्ट्रात स्थापन केले.

दलित पँथर या आक्रमक संघटनेने दलितांवरील अन्यायाचा प्रतिकार केला. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्व शोषित मागासवर्गीयांना एकत्र करून त्यांना अन्यायाचा प्रतिकार करण्याची अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दलित या शब्दामुळेच मिळत होती. त्यामुळेच दलित पँथर हा संघटन आम्ही स्थापन केले . त्यामुळे दलित हा शब्द नकारात्मक नसून तो दलितांना लढण्याचीच प्रेरणा देणारा शब्द असल्यामुळे मीडियामध्ये तो शब्द वापरण्यावर सरसकट बंदी घालणे योग्य ठरणार नाही असे मत रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले. सरकारी कामकाजात दलित शब्द वापरण्यास बंदी घालणे योग्य असून मीडियामध्ये मात्र दलित शब्द वापरण्यास नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णया योग्य नाही. या निर्णयाविरुद्ध रिपब्लिकन पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे आठवलेंनी आज जाहीर केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्र्यांची मनसे कार्यालयाला भेट; पुन्हा मनसे-शिंदे युतीच्या चर्चा

Aprna

भाजपकडून युतीसाठी एक पाऊल पुढे

News Desk

माणचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार

News Desk
मनोरंजन

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर सावधान !

News Desk

मुंबई । महाराष्ट्रात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. गणेश भक्त लालबागच्य२ राजाच्या दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारणची चांगलीच चंगळ झाली आहे. लालबाग परिसरात अन्य ठिकठिकाणी गणपती बाप्पा मंडळात विराजमान होऊन चार दिवस उलटले आहे. परंतु याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे गणेश भक्तांच्या पाकीटावर हात सफाई करत होते.

तसेच लालबाग परिसरातील काळाचौकी पोलीस ठाण्यात गेल्या चार दिवसांपासून जवळपास १३५ मोबाईल चोरीच्या तक्रारीची नोंद करण्यात आली. मोबाईलच्या तक्रारी नोंदवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. मोबाईल चोरीच्या सर्वात जास्त तक्रारी या लालबागचा राजा परिसरात घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील गणेशोत्सवात लालबाग आणि परळ भागातून गणपती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. या गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमे-यांची सोय केली असून यांच्या आधारे या पाकीट मारांचा पोलीस शोध घेत आहेत. गतवर्षी देखील गणेशोत्सवाच्या काळात पाकीट मार भुरट्या चोरींचा सुळसुळाट होता. तेव्हा पोलिसांनी दोन चो-यांच्या टोळ्या सुरत गॅग आणि यूपी गॅग आशी या दोन्ही टोळीची नावे होती.

Related posts

Gandhi Jayanti : राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाहून विनोद तावडेंचा ‘आवाज’ चढला

swarit

Kargil Vijay Diwas : थोडक्यात जाणून घ्या…’कारगिल’विषयी

News Desk

FLASHBACK 2018 : सहा महिलांची ‘नाविका सागर परिक्रमा’

News Desk