HW News Marathi
राजकारण

हिवाळी अधिवेशन सुरू, सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक सज्ज

मुंबई | विधीमंडळ आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (१९ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. रविवार, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या सुट्टया वगळता यंदाचे हिवाळी अधिवेशनासाठी अवघे आठ दिवस कामकाज होणार आहे. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ,अवनी वाघिणीच्या हत्या, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

आतापर्यंतच्या अधिवेशनाची आकडेवारी पाहिली तर, आघाडी सरकारच्या काळात अधिवेशनाचे दिवस कमी असल्याचे दिसून येतात. परंतु सरासरी तीनशे तास कामकाज झाल्याचे देखील दिसून आले आहे. तर युती सरकारच्या काळात एकाही वर्षी ३०० तास कामकाज झालेले नाही. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तब्बल ५५ वर्षांनी मुंबईत होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेतले जात होते. परंतु भाजप सरकारने यंदाचे हिवाळी अधिवेसन मुंबईत घेण्याच निर्णय घेताल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…जालना मतदारसंघाबाबत

News Desk

पर्रीकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती | ठाकरे

News Desk

आता न्यायालय देखील म्हणते ‘चौकीदार चोर है’ !

News Desk