HW News Marathi
राजकारण

रथयात्रेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रथाखाली चिरडू !

नवी दिल्ली | ‘पश्चिम बंगालमध्ये लोकशाही स्थापन करणे हा या रथयात्रेमागचा मुख्य हेतु आहे. त्यामुळे जे लोक ही रथयात्रेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाखाली चिरडू’ असे धक्कादायक वक्तव्य भाजपच्या राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी केले आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी या व्यक्तव्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच ५, ७ आणि ९ डिसेंबर रोजी राज्यातील ४२ लोकसभा मतदारसंघात रथयात्रा काढण्याचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी घेतला आहे. रथयात्रेनंतर कोलकाता येथे भाजपची एक सभा होणार आहे. या सभेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह मार्गदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

News Desk

“‘मविआ’चा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल कराला कोणाची हरकत नाही”, ठाकरेंचा आंबेडकरांना सल्ला

Aprna

“…तेव्हा कळेल, वारसाला मिळते की कर्तृत्वाला”, शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबेंना टोला

Aprna
राजकारण

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पर्यटकांची पसंती

News Desk

सूरत | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्ताने ऐक्याचे प्रतीक म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा पुतळा देशातील सर्वात उंच १८२ असून स्टॅच्यू ऑफ युनिटी हे नर्मदा नदीतील सरोवरामध्ये उभारण्यात आले आहे.

या पुतळ्यावरून देशातील राजकरणात अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतु अवघ्या काही दिवसात सर्वसामान्य पर्यटकांमध्ये मात्र स्टॅच्यू ऑफ युनिटी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. केवळ दिवाळीच्या सुट्टीमध्येच सुमारे ७५ हजार पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली असून, केवळ येथील तिकीटविक्रीमधूनच सुमारे अडीच कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

मात्र या पुतळ्याची प्रवेश फी ही जगप्रसिद्ध ताहमहलच्या प्रवेश फीपेक्षा सातपट अधिक महाग असल्याने काही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे. सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे मुख्य अभियंता पी.सी. व्यास यांनी सांगितले की, केवळ गुजरातच नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधूनही येथे पर्यटक येत आहेत.

Related posts

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाले…

Aprna

राजीनामा देण्यासाठी आरबीआय गव्हर्नर यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव ?

swarit

आम्ही लोकांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम करतो !

News Desk