HW News Marathi
राजकारण

आम्ही विराेधी पक्षात नव्हे तर सत्तेत असू !

पुणे | “मुख्यमंत्र्यांनी काहीच दिवसांपूर्वी असे म्हटले आहे कि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष येत्या विधानसभेनंतर विराेध पक्ष म्हणून समोर येईल. पण मुख्यमंत्र्यांनी ते विधान वंचितला घाबरून केले आहे. खरंतर येत्या काळात आम्ही विराेधी पक्षात नाही तर सत्तेत असू”, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. काहीच दिवसांपूर्वी एमआयएमने स्वबळाचा नारा दिल्याने वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडली. या पार्श्वभूमीवर देखील प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

वंचितने एमआयएमसाठी कधीही दरवाजे बंद केले नाहीत !

“वंचितने एमआयएमसाठी कधीही दरवाजे बंद केले नाहीत. एमआयएमसाठी आमचे दरवाजे अद्याप खुले आहेत. मात्र, त्यांनीच कुलूप लावून घेतले आहे आणि त्याची चावी देखील त्यांच्याकडेच आहे”, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा केले आहे. “एमआयएम हा पक्ष संविधानाची शपथ घेऊन काम करतो. त्यामुळे आम्ही त्यांना धर्मनिरपेक्ष पक्ष मानतो”, असे म्हणत आपले एमआयएमसोबत बोलणे सुरु असल्याची माहिती देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

खासगी धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावे !

“राज्यात जशी सरकारी धरणे आहेत तशीच अनेक खाजगी धरणेदेखील आहेत. टाटाच्या ५धरणांमधून वीजनिर्मिती केली जाते. या खासगी धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावे”, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. “सध्या राज्यात विजेचे अतिरिक्त उत्पादन हाेत आहे. ही अतिरिक्त वीजनिर्मिती हळूहळू बंद करून या धरणांमधील पाणी दुष्काळी भागाला देण्यात यावे. आम्ही सत्तेत आलो तर टाटा समूहाशी बाेलून ही याेजना अंमलात आणू”, असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रभू रामचंद्रांची फसवणूक भाजपाला पडणार महागात

News Desk

‘वर्षा’ निवासस्थानी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानींची भेट; राज्यात चर्चेला उधाण

Aprna

नवी मुंबई, ठाण्यासह पुणे शहराच्या नामकरणाची मागणी

News Desk