HW News Marathi
राजकारण

यंदाच्या दिवाळीत एक दिवा श्रीरामाच्या नावाने पेटवा !

नवी दिल्ली | ‘यंदाच्या दिवाळीत एक दिवा श्रीरामाच्या नावाने पेटवा, लवकरच काम सुरू होणार आहे. दिवाळी झाल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीचे पाहू’ असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. अयोद्धा राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला असताना योगी आदित्यनाथ यांचे हे वक्तव्य केले आहे. योगी आदित्यनाथ राजस्थान मधील एका कार्यक्रमात बोलत होते.

“राम मंदिराचे प्रकरण न्यायालयात आहे, पण लवकरात लवकर यावर निर्णय यावा अशी आमची इच्छा आहे’, असे केंद्रीय मंत्री पीपी चौधरी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे जर न्यायालयाच्या निकालासाठी वेळ लागणार असेल तर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा, अशी वैयक्तिक मागणी असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अयोध्या राम मंदिराचा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ट असताना सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केवळ मतांचे राजकारण करीत असताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्या, काँग्रेसची मागणी

News Desk

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे मध्यरात्रीच वाराणसीत दाखल

News Desk

सुषमा स्वराज २०१९ च्या लोकसभा निवडणुका लढविणार नाहीत

News Desk