HW News Marathi
राजकारण

बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा ही आपुलकी दिसली नाही

मुंबई | 1993 च्या दंगलीप्रकरणी 2000 साली वयाच्या 70 व्या वर्षी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा कुणी तो कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तेव्हा ही आपुलकी दिसली नाही, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीविषयी ते बोलत होते. मी चोरुनही ती मुलाखत पाहिली नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख आर्थिक निकषांवर आरक्षण मागत होते तेव्हा त्यांची भूमिका स्वीकारली असती तर आज ज्या जातीच्या भिंती उभ्या आहेत त्या दिसल्या नसत्या. शिवसेनाप्रमुखांचा कुठलाच निर्णय चुकला नाही हे काल सिद्ध झालं, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

Aprna

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार! – मुख्यमंत्री

Aprna

शिवसेनेला मत देणे छिंदमला पडले महागात, शिवसैनिकांकडून मारहाण

News Desk
राजकारण

पवारांची मुलाखत चोरूनही पाहिली नाही – उद्धव ठाकरे

News Desk

मुंबई | ‘मी चोरूनही पवारांची मुलाखत पाहिली नाही,’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. संपूर्ण महाराष्ट्र या मुलाखतीची वाट बघत होता. पुढे ठाकरे म्हणाले की, ‘शिवसेनाप्रमुख जेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण द्या म्हणत होते, तेव्हाच त्यांची भूमिका स्वीकारली असती तर आज जातीच्या भिंती उभ्या राहिल्या नसती.’

‘१९९३च्या दंगलीबाबात २००० साली बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी शरद पवारांची बाळासाहेबांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती,’ असा सवाल उपस्थित करुन उद्धव यांनी पवारांवर टीका केली.पुण्यात ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली.

Related posts

फक्त सत्ता आणि निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा आधी दुष्काळाला पटकी द्या !

News Desk

कॉंग्रेसने जनतेला मुर्ख बनविले

News Desk

‘२०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार’

Gauri Tilekar