HW News Marathi
राजकारण

आम्हाला बी टिम म्हणून हिणवणारे आता भाजपचे गुलाम !

मुंबई | “आम्हाला भाजपची बी टिम म्हणून हिणवणारे आता भाजपचे गुलाम झाले आहेत”, असा टोला वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांना लगावला आहे. “आम्ही विधानसभेकरिता काँग्रेसपुढे १४४-१४४ जागांचा प्रस्‍ताव ठेवला होता. परंतु, आता तेच भाजपच्‍या इशार्‍यावर चालत आहे”, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी एमआयएमसोबतच्या युतीबाबत देखील भाष्य केले आहे.

“लोकसभेनंतर ‘वंचित’ला भाजपची बी टीम म्हणून हिणवणारेच आता भाजपचे गुलाम झाले आहेत”, अशी टीका करत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबतच्या युतीबाबत देखील भाष्य केले आहे. “विधानसभेकरिता एमआयएमसोबत चर्चा करण्याची अद्याप आमची तयारी आहे. एमआयएमसोबत चर्चेसाठी आमची दारे खुली आहेत. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद नाही. त्यांच्याकडून हि दार बंद झाली आहेत”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीत जागावाटपावरून उभी फुट पडली. एमआयएम आता स्वबळावर लढणार, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त करत अशी घोषणा केली. त्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील त्यावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर “एमआयएमसोबत आमची युती कायम असून या युतीसाठी अर्ज भरण्याच्या शेवट दिवसापर्यंत वाट बघणार आहोत,” असे आंबडेकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थरुर यांना मोदींविरोधात केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जातमुचलक्यावर जामीन मंजूर

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…जळगाव मतदारसंघाबाबत

News Desk

आधी स्वतःच घर सांभाळा, त्यानंतर देश सांभाळा !

News Desk