HW News Marathi
राजकारण

आज सज्जन कुमार, उद्या टाइटलर, त्यानंतर कमलनाथ तर सर्वात शेवटी गांधी परिवार !

नवी दिल्ली | “आज सज्जन कुमार, उद्या जदगीश टाइटलर, त्यानंतर कमलनाथ आणि शेवटी गांधी परिवाराला देखील याचे परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी दिला आहे. १९८४ साली झालेल्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज (१७ डिसेंबर) दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हरसिमरत कौर बोलत होत्या. १९८४ साली झालेल्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमारला दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानू इच्छिते. पंतप्रधान मोदींनी २०१५ मध्ये अकाली दलाकडून केल्या गेलेल्या मागणीचा विचार करून एसआयटीमार्फत १९८४ साली झालेल्या या दंगली प्रकरणी तपास केला. १९८४ सालची दंगल ही एक मोठी दुर्घटना होती. आता या दंगलीतील मुख्य आरोपी सज्जन कुमारला शिक्षा झाली आहे. शीख समुदायासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे”, असे हरसिमरत कौर यांनी म्हटले आहे.

काय आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल ?

१९८४ साली झालेल्या शीख दंगल प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमारला दोषी ठरवत त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणातील अन्य पाच दोषींना १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सज्जन कुमारला आजन्म कारावासासह ५ लाखाचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. तसेच इतर दोषींना दंड म्हणून प्रत्येकी एक-एक लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालायने सर्व दोषींना ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्यास सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शदर यादव यांना येते बाळासाहेबांची आठवण

swarit

शहाडचे पंपिंग स्टेशन महापालिकेला हस्तांतरित करा | आमदार किणीकर

News Desk

कोस्टल रोडचे काम थांबवा, उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश

News Desk