HW News Marathi
राजकारण

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

मुंबई | मंगळवार ११ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या हिवाळी अधिवेशनात एकूण २० बैठका होणार आहेत. आज मंगळवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी आणि संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांच्या निधनावर श्रध्दांजलीपर भाषण होऊन दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात येईल. यामुळे खऱ्या अर्थाने बुधवारपासून अधिवेशनाचे कामकाज सुरु होईल. विरोधी पक्षाकडून विविध मुद्दयांवर सरकारला घेरण्याचा पुर्ण प्रयत्न असणार आहे. तर सरकार कडून जास्तीत जास्त बील पारित करण्याचा प्रयत्न असणार आहे.

राफेल डील, इव्हिएम, महीला सुरक्षा, महागाई, पेट्रोलच्या किमती, आरबीआयचा मुद्दा अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारवर निशाना साधण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाचे ८ जानेवारीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी निवडणुकीला सामोरे जाण्यापुर्वी ३० जानेवारी ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हिवाळी अधिवेशनाच्या उत्तरार्धात मोदी सरकारने हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी ठेवली आहे.

मोदी सरकारसाठी शेवटच्या ठरणाऱ्या संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सत्रा दरम्यान विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना बील पास करण्याच्या कर्यात मदत करावी अशी अपील केली आहे. सर्वच विषयावर चर्चा व्हावी, संवाद व्हावा यासाठी आम्ही जास्त वेळ काम करण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज संध्याकाळी दिल्लीत एनडीएच्या संसदीय दलाची बैठक

News Desk

आम्ही आता राम मंदिरासाठी आणखी वाट पाहू शकत नाही !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ची हाफ सेंच्युरी

News Desk
महाराष्ट्र

नागपूरातील गुणवंत पदकांना मुकणार

News Desk

नागपूर | नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांना काहीसा नाराज करणारा ठरणार आहे. दानदात्यांनी सुधारित रकमेचा धनादेश देण्यास नकार दिल्यामुळे, तब्बल दीडशे सुवर्ण व रौप्य पदके कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे गतवर्षीपर्यंत ज्या अभ्यासक्रमांच्या गुणवंतांना सन्मानित करण्यात येत होते, ते यंदा त्याच अभ्यासक्रमांत मिळणा-या पदकांना मुकणार आहेत.

अभ्यासक्रमातील गुणवंतांना १०५ व्या दीक्षांत समारंभापर्यंत जवळपास ३४० पदके पारितोषिके प्रदान करण्यात येत होती. नागपूर विद्यापीठात काही दानदात्यांनी अगदी १९३० साली पुरस्कारासाठी निधी दिला होता. त्याकाळी मोठी वाटणारी अनामत रकमेची आताची किंमत फारच कमी आहे. त्या रकमेच्या आधारे दरवर्षी पदकांची निर्मिती करण्यासाठी विद्यापीठालाच निधी द्यावा लागत होता. त्यामुळे विद्यापीठाने दानदात्यांना पत्र लिहिले व आताच्या बाजारभावाच्या हिशेबाने सुधारित रकमेच्या धनादेशाची मागणी केली होती.

Related posts

‘पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही,’ अशोक चव्हाण

News Desk

सरकार येणार या आनंदात राहू नका, नाही आले तर दु:खही करू नका !

News Desk

‘१९ जुलैला होणाऱ्या ‘त्या’ ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थगित!

News Desk