HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार येणार या आनंदात राहू नका, नाही आले तर दु:खही करू नका !

इस्लामपूर | “आपले सरकार येणार आहे या आनंदात राहू नका, आणि नाही आले तर दु:खही करू नका,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. राज्यात सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याचप्रमणे या तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठकी नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत एक अहवाल तयार केला असून हा अहवाल मंजुरीसाठी त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे.

आज (१८ नोव्हेंबर) सकाळी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत जात असताना पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घेराव करून त्यांना राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादींची सरकार स्थापन होणार आहे का?, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हटले की, “विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्रित लढले होते. त्यांच्या युतीला बहुमतही मिळाले आहे. त्यामुळे सरकार कधी स्थापन होणार हे भाजप-शिवसेनेलाच विचारा,” असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेहली. मात्र, पवारांच्या या वक्तव्याने मात्र राजकीय वर्तुळा उलटसुलट चर्चांला उधाण आले आहे. या पाश्वभूमीवर पाटील यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारण ढवळून निघाले आहे. पाटील यांनी इस्लामपूरमधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या ५१ व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमादम्यान उपस्थिताना संबोधित करताना म्हणाले

नेमके काय म्हणाले जयंत पाटील

“सोनिया गांधी दिल्लीत आज शरद पवारांना भेटणार आहेत. या भेटीदरम्यान शिवसेनेला पाठिंब्यासंदर्भात अधिकृतरित्या चर्चा होईल. या चर्चेस शिवसेनेला पाठिंब्याचा प्रश्न सुटला तर मला कदाचित उद्या सायंकाळी दिल्लीला जावे लागण्याची शक्यता आहे. उद्या दिल्ली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील होईल. दोन पावले पुढे जाण्याची शक्यता आहे. घाई करून नका की झाले आता, राजकारणात सगळे पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवण्याचा नसतो. त्यामुळे कोणीही सध्या कोणीही आनंद करण्याची गरज नाही आणि दुख करण्याची गरज नाही, कारण आपण विरोधी पक्षात आहोत, असे सांगत कार्यकर्त्यांना सल्ला दिला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दारही होम क्वारंटाईन

News Desk

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाईचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलं!

News Desk

उस्मानाबादेत लाच स्वीकारताना महिला उपजिल्हाधिकारी अडकल्या पोलिसांच्या जाळ्यात!

News Desk